एक्स्प्लोर

नथुराम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी...; हर्षवर्धन सपकाळांची प्रखर टीका

राज्यात ओबीसींना असलेल्या 17 टक्के आरक्षणात अन्य समाज आल्याने दोन्ही समाजाला न्याय देणं कठीण आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही.

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC) वाद टोकाला पोहोचला असून मराठा मोर्चानंतर आता ओबीसी समाजाचे मोर्चे आणि आंदोलन होत आहेत. महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी करत आज नागपूरमध्ये ओबीसींचा मोठा मोर्चा निघाला होता. त्याच, अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. नथुरम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी (Devendra Fadnavis) ही भांडणं लावत आहेत, अशी प्रखर शब्दात सपकाळ यांनी आरक्षणाच्या वादावरुन मुख्यमंत्र्‍यांवर टीका केली.

राज्यात ओबीसींना असलेल्या 17 टक्के आरक्षणात अन्य समाज आल्याने दोन्ही समाजाला न्याय देणं कठीण आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मुख्यमं६ी देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक जाती जातीत भांडणं लावत आहेत. मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर लागू करुन गुलाल उधळून देवेंद्रजीनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काम केलं आहे. मात्र, राहुल गांधींचा उपाय रामबाण आहे, तो म्हणजे जातीनिहाय जनगणना. तेलंगणा येथे काँग्रेस राजवटीत जातीय जनगणना झाली. त्यामुळे, 42 टक्के ओबीसींना आरक्षण मिळालं, मग देवेंद्रजी ते का करत नाहीत, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. तसेच, नथुराम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी ही भांडणं लावत आहेत, अशी प्रखर शब्दात सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तर, राधाकृष्ण़ विखे पाटलांनी वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम केलंय, असेही त्यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम

सहकारी मंत्री बाबासाहेब देसाई यांनी शेतकरी कर्ममाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी संताप व्यक्त केला. गाण्याचा नाद लागतो, रम्मीचा नाद लागतो इतकं बेशरम पद्धतीचं वक्तव्य मंत्री करतोच कसा. खोटं बोलून आम्ही सत्ता मिळवतो याची कबुली त्यांनी दिली आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे, उपरोक्त अनुदान दिलं नाही. खोटं पॅकेज जाहीर करता, त्या पॅकेजमध्येही काही नाही. याशिवाय अशी वक्तव्य करुन ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांनी मुंबई विक्रिला काढलीय - सपकाळ

काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर सर्व सामान्यांसाठी हौसिंग बोर्ड स्थापन केले, त्या काळास सर्व जमीन सरकारची ही भूमिका घेतली. विनोबा भावेंनी भूदान आणलं, त्यानुसार कसेल त्याची जमीन कूळ कायदयांतर्गत नेहरूनी कायदा आणून जमीन कसणाऱ्यांना जमिनींचं मालक केलं. तर, इंदिरा गांधींनी गायरान जमिनीचा निर्णय घेतला, भाडेकरुंनाही अधिकार दिले. गिरणींच्या जमिनींमध्येही 33 टक्के निर्णय घेतला, या शिवाय उपलब्ध जमिनीवर वसाहती उभे करणे हा निर्णय झाला. मात्र, आता मुंबईही विक्रीला काढली आहे. ज्यांना घरं बांधून दिली ती 12 हजार आहेत पण घर न मिळालेले 1 लाखांहून अधिक आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार (Chandrashekhar bawankule)

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी मु्ख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांवर बोलले तरच मिडिया त्यांची दखल घेईल, असं त्यांचं असतं. कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहे का? काय बोलतात, असे बावनकुळे यांनी म्हटले. काँग्रेस पूर्णच साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा दवडत्यात, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा

दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा; अहिल्यानगरमधील सभेनंतर अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget