एक्स्प्लोर

कोरोनाबाधितांचं होम क्वारंटाईन महागात पडतंय?

मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या घरीच उपचार सुरू असलेले कोरोना रूग्णांची संख्या 18,797 इतकी आहे. तर, विविध रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण 7600 इतके आहेत.

मुंबई : तुमच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असतील किंवा अजीबातच लक्षणे नसतील तर कोरोना घरी राहुनही बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाबाधितांचं रुग्णालयात न जाता होम क्वारंटाईन होणं जीवावर बेतु शकतं. गेल्या काही दिवसांत लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचा अचानक झालेला मृत्यू होम क्वारंटाईन उपचार पद्धधतीविषयी साशंकता निर्माण करतोय.

9 जून रोजी बीएमसीचे उपायुक्त शिरिष दीक्षित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरी मृत्यू झाला. शिरीष दिक्षित हे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत महापालिका मुख्यालयात कर्तव्यावर हजर होते आणि त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. म्हणून त्यांनी घरीच उपचार घेण्याचे ठरवले आणि 24 तासांतच त्यांना मृत्यूनं गाठलं. 15 मे रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले 32 वर्षीय पोलिस निरिक्षक अमोल कुलकर्णी कोरोनाबाधित होते. होम क्वारंटाईन असताना चेंबूरमधील राहत्या घरीच कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

दक्षिण मुंबईतील एका डायबिटीक पेशंट 15 मे ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल खालवल्यानंतर त्याच्या मुलानं दिवसभर अँम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल बेडसाठी फोन आणि धावाधाव केली मात्र उपलब्ध न झाल्यानं 23 मे रोजी त्यांचा घरीच मृत्यू झाला.

या सर्वांचे मृत्यू अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक होते. सौम्य लक्षणे किंवा कोणतीच लक्षणे न दाखवणाऱ्या कोरोनानं यांचा अचानक घात केला. महत्वाचं म्हणजे फार गंभीर स्थिती नाही म्हणून यांना घरीच उपचार दिले जात होते. पण, हेच घरचे उपचार महागात पडले. सुरुवातीला जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. त्यावेळी प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल व्हायचा.मात्र, नंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली.आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी ज्या घरात होम आयसोलेशन शक्य असेल त्या रुग्णांना घरीच थांबून उपचाराचा सल्ला दिला जाऊ लागला.

मुंबईकरांना रुग्णखाटा असूनही घरीच उपचार घेण्यासाठी का सुचवले जाते?

मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या घरीच उपचार सुरू असलेले कोरोना रूग्णांची संख्या 18,797 इतकी आहे. तर, विविध रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण 7600 इतके आहेत. सध्या मुंबईत प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले रुग्ण म्हणजेच अॅक्टिव्ह कोरोना केसेस आहेत 26,379. तसंच, येत्या दहा दिवसांत आणखी ३०० नवे आयसीयू बेडस् महापालिका तयार करत असल्याचं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलंय.

म्हणजेच जर रुग्ण खाटांची संख्या वाढत असेल तर उपलब्ध असलेल्या खाटा रुग्णांना जलदगतीनं का मिळत नाहीत? यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि उपलब्ध रिकाम्या रुग्णखाटांचे केवळ आकडे दाखवण्यासाठी कोरोनाबाधितांना घरीच रहा असा सल्ला दिला जातोय का असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.अर्थात गरजुंना आणि गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना रुग्णखाटा प्राधान्यानं मिळाव्यात हा ही त्यामागे उद्देश आहेत. मात्र, होम क्वारंटाईनचा पर्याय निवडतांना रुग्णांची वेळोवेळी तपासणी आणि गरज पडल्यास तातडीचे उपचार मिळणंही तितकच गरजेचं आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. अमित मायदेव सांगतात की, "कोरोना रुग्णांना होम क्वारंटाईन करुन उपचार सुरु करण्यापूर्वी रुग्णाच्या छातीचा एक्स रे काढणे गरजेचे असते. अतिसौम्य लक्षण असल्यास एक्स रे काढला जात नाही. मात्र, कोरोनाची खरी गंभीरता एक्स रे मार्फतच कळू शकते. तसंच, होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांनी रोज स्वत: स्ववत:ची ऑक्सिन पातळी मोजली पाहिजे व त्यातील बदलांची नोंद ठेवली पाहिजे. यासाठी ऑक्सिमिटर चा वापर करायला हवा, ऑक्सिजन पातळी 93 च्या खाली जाणे धोकादायक ठरु शकते"

त्यामुळे, घरीच राहून कोरोनाला हरवा हे वाक्य आपण कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून वापरता येऊ शकतं. मात्र, कोरोना झाला तरी घरीच रहा हे मात्र जिवावर बेतु शकतं.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut on Sanjay Dina Patil : आम्हाला राऊत म्हणतात, धमकी देऊ नको, आता सुनील राऊत मैदानात, संजय दिना पाटलांना आव्हान
आम्हाला राऊत म्हणतात, धमकी देऊ नको, आता सुनील राऊत मैदानात, संजय दिना पाटलांना आव्हान
एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल? गल्ली ते दिल्लीपर्यंत शिष्टाई? देवेंद्र फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवलला, म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल? गल्ली ते दिल्लीपर्यंत शिष्टाई? देवेंद्र फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवलला, म्हणाले....
Mumbai Local Train : पावसाचं पाणी आत येत होतं म्हणून वाद, संतापून बॅगेतून चाकू काढला अन्...; खचाखच भरलेल्या लोकलमध्ये आरोपीने मयंकला संपवल्याची पूर्ण कहाणी पोलिसांसमोर मांडली
पावसाचं पाणी आत येत होतं म्हणून वाद, संतापून बॅगेतून चाकू काढला अन्...; खचाखच भरलेल्या लोकलमध्ये आरोपीने मयंकला संपवल्याची पूर्ण कहाणी पोलिसांसमोर मांडली
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब

व्हिडीओ

Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
Narendra Mehta Mira bhayandar Land Scam : मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Embed widget