एक्स्प्लोर

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग मुंबईत वाढणार नाही : सर्वेक्षण

सर्वेक्षणानुसार काही प्रमाणात मुंबईकरांची तिसऱ्या लाटेची चिंता कमी होत असली तरी नागरिकांनी घालून दिलेले नियम पाळण्याची आणि प्रशासनाने अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरण करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका तुलनेने कमी असेल, असा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्च या संस्थेने आपल्या सर्वेक्षणात केला आहे. सर्वेक्षणानुसार साधारणपणे 80 टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ह्या अभ्यासात दुसऱ्यांदा करोना होणाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना होण्याचा धोका असल्याचंही या सर्वेक्षणात नमूद केले आहे. 
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्च या संस्थेने केलेले सर्वेक्षण तिसऱ्या लाटेबाबत मुंबईकरांची चिंता काहीशी कमी करणारे आहे. या सर्वेक्षणानुसार 80 टक्के मुंबईकराना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे किंवा ते कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग मुंबईत वाढणार नाही, अस या सर्वेक्षणमध्ये सांगण्यात आलाय

मात्र, जरी तिसऱ्या लाटेत सर्वेक्षणानुसार कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका नसला तरी व्यक्तींना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याच सुद्धा सांगितलं आहे. देशात करोनाचा शिरकाव होऊन 17 महिन्यांहूनही अधिक काळ आता लोटला आहे. त्यामुळे ज्यांना अगदी सुरुवातीला पहिल्या लाटेतच कोरोना होऊन गेला, त्यांच्यातली अँटिबॉडीज आता कमी झाली असतील तर त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं मत या संशोधकांनी मांडल आहे

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डमेंटल रिसर्चचे सर्वेक्षणमधील मुद्दे 

  • डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता साधरणपणे सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना आपल्याला करावा लागेल. 
  • 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात आल्याने या लाटेचा धोका तुलनेने कमी असेल. 
  • शिवाय जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकऱण झालं आणि लस 75 ते 95 टक्के प्रभावी ठरली तर मात्र या तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होईल.
  • सोबतच तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याबाबत खबरदारी घेणे सुद्धा आवश्यक आहे.

मुंबईत स्थानिक प्रशासनाने पुनर्बाधितांवर लक्ष केंद्रित करायला हवं आणि लवकरात लवकर त्यांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे अजूनही ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, अशा 20 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरज असल्याच संशोधकांचं म्हणणं आहे.

त्यामुळे या सर्वेक्षणानुसार काही प्रमाणात मुंबईकरांची तिसऱ्या लाटेची चिंता कमी होत असली तरी नागरिकांनी घालून दिलेले नियम पाळण्याची आणि प्रशासनाने अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरण करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे. जेणेकरून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्ष येणारी तिसरी लाट तुनलनेने कमी धोक्याची राहील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode : राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
SRPF : मोठी बातमी,अखेर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget