एक्स्प्लोर

दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल

राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे.

मुंबई : कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच सांगितलंय. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे. मुंबई आयआयटीच्या कम्प्यूटर सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉ भास्करण रमण यांनी कोरोनावर नियंत्रणाबाबात हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात लेविट्स मेट्रिक्स गणितीय सूत्राचा वापर करून ग्राफीकल प्रेझेन्टेशन केलं गेलं आहे. यामध्ये आजच्या कोरोनामुळे मृत्यूची संख्या आणि काल कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येचा वापर या सूत्रात करून कोरोना देशातील राज्यातील भागात कधी नियंत्रणात येणार हे सांगितलं आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अहवालाबद्दल एबीपी माझा माहिती दिली.आयआयटीच्या अहवालानुसार ज्याप्रकारे मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 70 टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना 2 आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा सांगण्यात आलं आहे. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशात अडीच महिन्यात कोरोना नियंत्रण मध्ये येणार आहे, असं त्या म्हणाल्या. अहवालानुसार कोरोनावर नेमकं नियंत्रण कसं येणार  मुंबईत - 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण दिल्लीत- अडीच आठवड्यात कोरोनावर नियंत्रण गुजरात- कोरोनावर नियंत्रण राज्यात- दोन महिन्यात कोरोनावर नियंत्रण देशात - अडीच महिण्यात कोरोनावर नियंत्रण कोरोना नियंत्रणात आला म्हणजे पूर्णपणे संसर्ग कमी झाला असं न समजता मृत्यूदर म्हणजेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या नियंत्रणात आली असं समजण्यात यावं असं या अहवालात सांगितलं आहे. त्यामुळे नियंत्रण जरी या अहवालानुसार मिळवलं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. तर दुसरीकडे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मुंबई मिळवू शकतो, असं जरी महापौर म्हणाल्या असल्या तरी मृत्यूदर कमी करण्याचा मोठं आवाहन अजूनही मुंबईसमोर आहे. या अहवालानुसार मुंबईत जरी दोन आठवड्यात कोरोना नियंत्रणात आला तरी राज्यात नियंत्रणात यायला 2 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यात सुद्धा नियंत्रणमध्ये आला तरी कोरोनापासून आपला भाग मुक्त झाला किंवा कोरोनापासून आपण कायमचे सुटलो असं न समजता कोरोनाशी लढताना प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget