एक्स्प्लोर

दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल

राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे.

मुंबई : कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच सांगितलंय. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे. मुंबई आयआयटीच्या कम्प्यूटर सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉ भास्करण रमण यांनी कोरोनावर नियंत्रणाबाबात हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात लेविट्स मेट्रिक्स गणितीय सूत्राचा वापर करून ग्राफीकल प्रेझेन्टेशन केलं गेलं आहे. यामध्ये आजच्या कोरोनामुळे मृत्यूची संख्या आणि काल कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येचा वापर या सूत्रात करून कोरोना देशातील राज्यातील भागात कधी नियंत्रणात येणार हे सांगितलं आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अहवालाबद्दल एबीपी माझा माहिती दिली.आयआयटीच्या अहवालानुसार ज्याप्रकारे मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 70 टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना 2 आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा सांगण्यात आलं आहे. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशात अडीच महिन्यात कोरोना नियंत्रण मध्ये येणार आहे, असं त्या म्हणाल्या. अहवालानुसार कोरोनावर नेमकं नियंत्रण कसं येणार  मुंबईत - 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण दिल्लीत- अडीच आठवड्यात कोरोनावर नियंत्रण गुजरात- कोरोनावर नियंत्रण राज्यात- दोन महिन्यात कोरोनावर नियंत्रण देशात - अडीच महिण्यात कोरोनावर नियंत्रण कोरोना नियंत्रणात आला म्हणजे पूर्णपणे संसर्ग कमी झाला असं न समजता मृत्यूदर म्हणजेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या नियंत्रणात आली असं समजण्यात यावं असं या अहवालात सांगितलं आहे. त्यामुळे नियंत्रण जरी या अहवालानुसार मिळवलं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. तर दुसरीकडे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मुंबई मिळवू शकतो, असं जरी महापौर म्हणाल्या असल्या तरी मृत्यूदर कमी करण्याचा मोठं आवाहन अजूनही मुंबईसमोर आहे. या अहवालानुसार मुंबईत जरी दोन आठवड्यात कोरोना नियंत्रणात आला तरी राज्यात नियंत्रणात यायला 2 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यात सुद्धा नियंत्रणमध्ये आला तरी कोरोनापासून आपला भाग मुक्त झाला किंवा कोरोनापासून आपण कायमचे सुटलो असं न समजता कोरोनाशी लढताना प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget