एक्स्प्लोर

विश्वगुरू असल्याची जाहिरातबाजी कशाला? मोदींमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan : जगात भारत हा दरडोई उत्पन्न सगळ्यात कमी असलेल्या देशांपैकी एक असताना विश्वगुरू म्हणून जाहिरातबाजी करण्यात काहीच अर्थ नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 

मुंबई भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान मोदी हे विश्वगुरू असल्याचे म्हटले जात असताना दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नसून त्यांच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर कमी झाला असल्याचे म्हटले आहे. जगात भारत हा दरडोई उत्पन्न सगळ्यात कमी असलेल्या देशांपैकी एक असताना विश्वगुरू म्हणून जाहिरातबाजी करण्यात काहीच अर्थ नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध राजकीय मुद्यांवर थेट भाष्य केले आहे. चव्हाण यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नाही. भारताच्या लोकसंख्येमुळे पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली. देशातील सगळ्याच घटकांचे मोठे योगदान आहे. यामध्ये कष्टकरी वर्गाचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेला जी गती होती, ती कायम राहिली असती तर आज भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर असती. पंतप्रधान मोदींनी नोटबंदीपासून अनेक चुकीचे निर्णय घेतले त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. देशाची अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर असली तरी दरडोई उत्पन्नात आपला क्रमांक खालच्या पातळीवर आहे. विकसित देश म्हणून असलेल्या निकषात आपण मागे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे विश्वगुरू म्हणून जाहिरात करण्यात अर्थ नाही. 

सरकारकडून शिक्षण, आरोग्यावर अतिशय कमी खर्च केला जातो. नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यातही आपण मागे आहोत. संशोधन आणि विकास कार्यक्रमावर (Research and Development) युपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्पाच्या एक टक्के खर्च केला जात होता. सध्याचे सरकार फक्त 0.6 टक्केच खर्च करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

इंडिया आघाडी एकजूट राहिल्यास विजय निश्चित

इंडिया आघाडीच्या प्रयत्नाबद्दल ही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. भाजपकडे नरेंद्र मोदी, हिंदुत्वाच्या नावावर सध्या 35 टक्के मतदान आहे हे मान्य करावे लागेल. तर, त्यांच्याविरोधात 60 ते 65 टक्के मतदान आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मतदान झाले. मात्र ते विभागले गेले. सध्या लोकसभेत विविध 38 पक्षाचे खासदार आहेत. काँग्रेस स्वबळावर लढली तर 2014, 2019 सारखी स्थिती होऊ शकते...आम्हाला ती स्थिती पुन्हा आणायची नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे आहे. पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचे भवितव्य धोक्यात असेल. त्यांना एकपक्षीय हुकूमशाही आणायची असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. 

इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये काही राज्यात जागा वाटपाचा तिढा आहे.. तो चर्चेने सोडवला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, त्या ठिकाणी सामंजस्याने निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप आणि एनडीएला कोणत्याही स्थितीत फायदा होऊ द्यायचा नाही असे ठरलं असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget