एक्स्प्लोर

Congress : मुंबईत काँग्रेसकडून तीन जागांची मागणी; ठाकरे ज्या जागा सोडणार नाही म्हणतात त्या जागेवरही दावा!

Congress : 27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये मुंबईमधील बैठकीत काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य या तीन जागांसाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महाविकास आघाडी जागावाटप अजूनही रखडलं असल्याचे स्पष्ट झालं आहे. आज (22 फेब्रुवारी) काँग्रेसची राज्य निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसकडून मुंबईमध्ये सहापैकी तीन जागांची मागणी करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून ज्या जागांवर दावा करण्यात आला आहे, त्याच जागेवर काँग्रेसकडूनही दावा करण्यात आल्याने आता हा कळीचा मुद्दा राहणार आहे. 

मुंबईतील तीन जागांवर दावा 

27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये मुंबईमधील बैठकीत काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य या तीन जागांसाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेसने तीन जागा लढवाव्यात आणि ठाकरे गटाने तीन जागा लढाव्यात अशी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता ज्या मतदारसंघांवर ठाकरे यांनी दावा केला आहे, तेच मतदारसंघ आता सोडणार का? याकडे आता लक्ष लागला आहे. 

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे गटाचा दावा

दुसरीकडे, दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) या जागेसाठी दावा करण्यात आला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अनिल देसाई यांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईमधील शाखांना भेटी देणे त्यासोबत बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यास शिवसेना खासदार राहुल शेवाळे विरोधात उभे राहू शकतात. याच जागेवर काँग्रेसकडून देखील दावा आहे. 

उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार

दुसरीकडे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ( Mumbai North West Loksabha) जागा सोडण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट नकार दिला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा खासदार गजानन किर्तीकर यांच्याकडे आहे. गजानन किर्तीकरांनी शिवसेनेतून ही जागा लढवली, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा करण्यात आला असून त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच गजानन किर्तीकर यांच्या जागेचा देखील समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget