एक्स्प्लोर

कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क, दोन लाखांवरची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीवर आपली भूमिका मांडली आहे. कर्जमाफीची ही योजना मार्चमध्ये सुरु होईल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. कर्जमाफी हा प्रथमोपचार आहे. मी हे नेहमीच सांगत आलो आहे. जो आता आपण करतो आहोत. मात्र शेतकरी त्याच्या पायावर उभा कसा राहील असा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीमध्ये नवीन प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, मग त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल ही संपूर्ण चेन असायला हवी, त्याची आखणी केली गेली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सामना वृत्तपत्रासाठी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.

विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण काही केलं तरी विरोधी पक्ष बोंबलणारच. आता आपण पीक कर्जाबद्दल बोलतो आहोत त्याला गेल्या सरकारने दीड लाखाची कर्जमाफी योजना जाहीर केली होती, ती अद्याप चालू होती. ही योजना मी दीड लाखावरुन दोन लाखांवर नेली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात ही योजना जाहीर केली. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने मी मागून घेतले आणि मला संपूर्ण शेतकरी, जे माझे बांधव आहेत त्यांना धन्यवाद द्यायचेत की, दोन महिने मी मागून घेतल्यानंतर त्यातल्या कोणीही त्याबद्दल तक्रार केली नाही.

दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार

दोन महिन्यांनंतर आपली कर्जमुक्ती होईल याची त्यांना खात्री आणि विश्वास आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे मार्चमध्ये ही योजना सुरु होईल. दोन लाखांपर्यंत ज्याचं पीक कर्ज आहे, ते पूर्ण माफ होणार आहे. म्हणजे त्याचा दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जाचा सातबारा आहे त्यावरून त्याचं पीक कर्ज काढलं जाणार आहे. दोन लाखांच्या वरचे जे कर्जदार आहेत किंवा कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी आणि जे नियमित कर्ज परतफेड करताहेत त्यांच्यासाठीसुद्धा आपण योजना लवकरच जाहीर करुन ती अमलात आणू, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

आधी कोल्हापूर पूरग्रस्थांना मदतनिधी द्या

कोल्हापूरमध्ये कुणी मोर्चा काढत असतील तर आनंद आहे. मात्र त्याच भाजपला मला सांगायचंय की, सातबारा कोरा करणं बाजूल ठेवा, आधी अवकाळी पाऊस झाला आणि पूरही आला होता, केंद्र सरकारकडून येणारे मदतीचे पैसे तिथे लोकांना अजून मिळाले नाहीत. ते मिळवण्यासाठीसुद्धा मोर्चा काढा. तोही प्रश्न खरं तर त्यांनी हाती घ्यायला हवा. नुसता विरोधासाठी विरोध करू नका, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. केंद्र सरकार नेमक्या कोणत्या दिशेने जाऊ इच्छिते हे मलाच काय, तर केंद्र सरकारला देखील कळतंय की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. सगळाच गोंधळ सुरू आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
Embed widget