एक्स्प्लोर

मुंबईत साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडलं, BMC च्या दाव्यानंतर ट्विटराईट्सचा संताप

मुंबई परिसरात साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटरपेक्षा अधिक पाणी महापालिकेच्या सहा पंम्पिंग स्टेशन्समधून समुद्रात सोडल्याची माहिती बीएमसीने दिली. त्यानंतर या पाण्याचं संवर्धन न केल्याबद्दल ट्विटराईट्सनी महापालिकेलाच धारेवर धरलं

मुंबई : मुंबईत काल (सोमवारी) रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा झाला. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे शाळा, कॉलेजांसह सरकारी आणि बहुतांश खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. दिवसभर पावसाने उसंत घेतल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनी महापालिकेच्या कारभारावर यथेच्छ ताशेरे ओढले, मात्र मुंबईतील सहा पंम्पिंग स्टेशन्सनी 14 हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडल्याची माहिती आहे. मुंबई परिसरात साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटरपेक्षा अधिक पाणी महापालिकेच्या सहा पंम्पिंग स्टेशन्समधून समुद्रात फेकून देण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन व्हिडिओ शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. समुद्रात सोडण्यात आलेल्या पाण्याची क्षमता ही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तुलसी आणि विहार तलावाच्या एकत्रित क्षमतेपेक्षा जास्त असल्याचा दावा बीएमसीने केला आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पर्जन्य जलाचा साठा केला जात नसल्याची झोड नेटिझन्सनी ट्विटरवर उठवली आहे. पाण्याचा निचरा समुद्रात करण्याऐवजी हे पाणी साठवलं असतं, तर त्याचा भविष्यात लाभच झाला असता, असं मत ट्विटरवर व्यक्त केलं जात आहे. एकीकडे, मुंबईची लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात जलसाठे वाढलेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध स्रोतांवरील ताण आधीच वाढत असताना, पाणी फेकून देणं चुकीचं असल्याची ओरड केली जात आहे. मुंबईत पावसाने उघडीप घेतलेली असली तरी संध्याकाळ होऊनही रेल्वे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत आहे. मुंबईकरांनी घरीच बसणं पसंत केल्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी आहे. मात्र मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget