एक्स्प्लोर
Advertisement
मुस्लिम आरक्षणासाठी भिवंडी ते आझाद मैदान लाँग मार्च
मुस्लिम समाजातील तरुणांसाठी रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 5 टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी मुस्लिम समाजाकडून लाँग मार्च काढला जात आहे.
मुंबई : मुस्लिम समाजातील तरुणांसाठी रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 5 टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी मुस्लिम समाजाकडून लाँग मार्च काढला जात आहे. भिवंडी ते आझाद मैदानापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मोर्चेकरी आज सकाळी भिवंडीहून निघाले असून मोर्चा ठाणे येथे पोहोचला आहे. मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशन या संस्थेच्या नेतृत्वाखाली मालेगाव येथून हा लाँग मार्चचे काढला आहे.
या लाँग मार्चसाठी भिवंडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हा मोर्चा मुंबई-नाशिक महामार्गावरुन आझाद मैदानावर धडकणार आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने 5 टक्के आरक्षणाची मागणी यावेळी मांडली जाईल.
आरक्षणासह समाजाच्या इतरही मागण्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'एबीपी माझा'ने मोर्चात सहभागी झालेल्या आमदार आसिफ शेख यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लोकसभा निवडणुकीनंतर विशाल मोर्चा काढला जाईल. या मोर्चाला सरकार जबाबदार राहील.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement