सावधान! अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला, मच्छीमारांना प्रशासनाच्या धोक्याच्या सूचना, पावसाचा जोर किती राहणार ?
Mumbai Rain: त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.

Mumbai Heavy Rains: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड ,रत्नागिरी तसेच पुणे सातारा व नाशिकच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे . आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील तीन ते चार तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने सर्व मच्छीमारांना प्रशासनाने धोक्याच्या सूचना दिल्या असून सतर्कतेचा इशाराही दिलाय.
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसांच्या सरी कोसळत आहेत .किनारपट्टीवर ही जोरदार पाऊस सुरू आहे .वाऱ्याचा वेग वाढला आहे .मुंबईच्या समुद्राला उधाण आले आहे .भरतीची वेळ रात्री आठ 53 ची आहे आणि समुद्रात 3.14 मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे .
अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला
अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहणार असून तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत (उत्तर महाराष्ट्र) तसेच ताशी 45 ते 55 कि. मी.राहणार असून ताशी 65 कि. मी.(दक्षिण महाराष्ट्र) वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.
19 Aug 2.30pm,#Mumbai & arnd rains in past 3 hrs & 6 hrs since 8.30 am today.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 19, 2025
Heavy🟡 to very heavy🟠 RF recd with max towards #Vileparle sides. City side 40-70mm rains & NM 70-100mm.
Hvy to very hvy🟠intermittent RF very likly to cont in nxt 3,4hrs seen frm radar.
🔴Alert is ON pic.twitter.com/JIEKRjwmqs
मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर 18 ते 22 ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीदरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 50 ते 60 कि.मी. राहणार असून तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत (उत्तर महाराष्ट्र)तसेच 45 ते 55 कि. मी. राहणार असून तो प्रति ताशी 65 कि. मी.(दक्षिण महाराष्ट्र) वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे. या कालावधीत वित्त व जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक यांना याबाबत सूचित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यातच समुद्र खवळलेला असून वाऱ्याचा वेग प्रति तास 50 ते 60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागात तो 70 किमी/ता. (उत्तर महाराष्ट्र) तर 65 किमी/ता. (दक्षिण महाराष्ट्र)पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 18 ते 22 ऑगस्टदरम्यान वादळी वारे राहणार असल्याने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
























