एक्स्प्लोर

Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं!

सरकारने या प्रकल्पबाधितांना हक्काचं घर द्यावं यासाठी ते रस्त्यावर संसार मांडून तब्बल 450 दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत होते. एबीपी माझाने त्यांची व्यथा मांडली आणि शासनाने त्याची दखल घेऊन आज त्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा निर्णय केला.

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माहुलवासियांची आज अखेर माहुलच्या नरकातून सुटका झाली आहे. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहुल मधल्या 206 प्रकल्पबाधितांना गोराई येथील म्हाडाच्या घराच्या चाव्या हस्तांतरित करून त्यांच्या स्थलांतरणाचा मार्ग मोकळा केला. सरकारने या प्रकल्पबाधितांना हक्काचं घर द्यावं यासाठी ते रस्त्यावर संसार मांडून तब्बल 450 दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत होते. एबीपी माझाने त्यांची व्यथा मांडली होती आणि शासनाने त्याची दखल घेऊन आज त्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा निर्णय केला. मात्र अजूनही या माहुल गावात शेकडो परिवार मरणयातना भोगत आहेत. साडे पाच हजार कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे NGT (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) चे आदेश धाब्यावर बसवून प्रदूषण करण्याऱ्या विषारी केमिकल कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या वर्ष अखेरीसपर्यंत माहुल गाव राहण्यायोग्य बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं! त्यासाठी या केमिकल कंपनींंच्या प्रतिनिधींशी MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाच्या अधिकऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. जून अखेरपर्यंत या कंपन्यांना नियमांचं पालन करण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा या कंपन्यांवर बंदीच्या कारवाईचा बडगा उचलणार असल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

माहुलमध्ये प्रकल्पबाधितांचं होणारं पुनर्वसन थांबवा, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या : हायकोर्ट

मागच्या युतीच्या सरकारच्या काळातही माहुलवासीयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र त्या सरकारमध्ये न्याय देण्याची इच्छाशक्ती होती का असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यामुळे माहुलवासीयांची घरं असोत किंवा गिरणी कामगारांची घरं, ठाकरे सरकार 100 दिवस पूर्ण करत असतांना युती सरकारच्या काळातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचा धडाका लावत असल्याचं यातून स्पष्ट होतंय. Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं! काय आहेत माहुलकरांच्या भावना ? आज नवीन जीवन मिळाल्यासारखं वाटतंय. आज 'घर बचाव, घर बनाव' आंदोलनाने 496 दिवस पूर्ण केले. आंदोलनाने 500 दिवसांचा टप्पा गाठण्याअधिच हक्काच्या घराची चावी हातात मिळाली याचा आनंद आहे. हे आमच्या संघर्षाचं यश आहे. यंदाची होळी आम्ही नवीन घरात साजरी करु. यासाठी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, सरकार आणि एबीपी माझाच्या विशेष आभार मानतो, अशी भावना माहुलवासियांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget