एक्स्प्लोर

Vasai Old railway Gate : पश्चिम रेल्वेकडून 100 वर्षाची जुनी पायवाट बंद, वसईतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचे हाल

रेल्वेने हे फाटक बंद केल्यामुळे 5 ते 10 किलोमिटरचा वळसा घालून शेतात जावं लागत आहे. केवळ शेतकरीच नाही तर मीठ उत्पादक, मच्छिमार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वसई : पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट पर्यंतचे सर्व रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका वसईतील उमेळमाण-दिवाणमान-नायगांव-टिवरी येथील गावकऱ्यांना झाला आहे. वसईत अंदाजे शंभर ते सव्वाशे वर्ष जून रेल्वेचं फाटक बंद करण्यात आलं आहे. रेल्वेने कोणतीही पूर्व सूचना न देता हे फाटक बंद केल्याने पूर्व आणि पश्चिमेकडील शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. हे फाटक लवकरात लवकर उघडावं यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा देखील सुरु आहे. सध्या हे फाटक बंद असल्यामुळे 5 ते 10 किलोमिटरचा वळसा घालून शेतात जावं लागत आहे. केवळ शेतकरीच नाही तर मीठ उत्पादक, मच्छिमार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वसईच्या उमेळमान गावातील राहणारे, पश्चिम रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता मागील 2 महिन्यांपासून हे रेल्वे फाटक बंद केलं आहे. तसा या रेल्वे फाटकाला 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे. जेव्हा वसईत रेल्वे धावत नव्हती तेव्हापासून इथल्या शेतकऱ्यांचा हा हक्काचा रस्ता होता. सुरुवातील जेव्हा दोन लाईन सुरु झाल्या तेव्हा रेल्वेने त्यांना फाटक बनवून दिलं होतं. फाटकाच्या पूर्वेला राजावली, टीवरी, नायगांव अशी गाव आहेत तर पश्चिमेला उमेळमान, दिवाणमान, ब-हाणपूर ही गाव आहेत. तर उमेळमान, दिवाणमान, ब-हाणपूर या गावातल्या अनेक ग्रामस्थांची, 50 एकर शेती ही वसई पूर्वेकडे आहे. पूर्वी याच रस्त्यावरून बैलगाडी जात असल्याचं इथले शेतकरी सांगत आहेत.

वसईच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी मिठागर आहेत. मीठ उत्पादक करणारे शेतकरी मजूर यांना देखील आता जाण्यायेण्यासाठी मोठा त्रास होत आहे. तर घरकाम करणाऱ्या महिला देखील याच गावातून ये जा करत असतात. त्यांचे देखील हाल झाले आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत रेल्वेने हे फाटक आम्हाला कोणतीच पूर्व सुचन न देता बंद केल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. सध्या रेल्वेने दोन्ही ठिकाणी भिंत आणि लोखंडी गर्डरच्या साह्याने हा रस्ता बंद केला आहे. सध्या इथल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल 5 ते 10 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत आहे. त्यातच आता भात पेरणीची काळ जवळ आला आहे. असं असताना आता भात पेरणी  करायची कशी, असा प्रश्न या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे. 

फाटक लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावं यासाठी स्थानिकांनी रेल्वेकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी देखील केली आहे. नाहीतर आम्हाला ये जा करण्यासाठी छोटा ब्रिज तरी बनवून द्यावा अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, रेल्वेने अद्याप त्यांना कोणतचं उत्तर दिलं नाही.

काही वर्षांपूर्वी सुरु झालेला दिवा वसई या रेल्वे मार्गासाठी पश्चिम रेल्वेने कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या. तेव्हा रेल्वेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नोकरी देण्याचं  आश्वासन दिलं होतं. मात्र, तेव्हाही नोकऱ्या मिळाल्या नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचं सांगत असताना आमच्या सारख्या शेतकऱ्यावर असा अन्याय का? असा सवाल इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon: आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget