एक्स्प्लोर

Satyacha Morcha Mumbai : 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा; बेकायदेशीर सभा अन् पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Satyacha Morcha Mumbai : मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली आणि 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Satyacha Morcha Mumbai मुंबई:  मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. या आरोपांना भाजपने 'मूक आंदोलना'ने उत्तर दिले. अशातच, मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली आणि 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

Satyacha Morcha Mumbai : बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन, आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन बघायला मिळालं. मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढला, तर भाजपने याला 'फेक नरेटिव्ह' म्हणत मूक आंदोलन केलं. भाजपने 'जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, ही विरोधकांची भूमिका आहे,' असा थेट आरोप केला. या मोर्चाला 'सत्याचा मोर्चा' असं नाव देण्यात आलं असून, यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.

भाजपने MVA च्या या आंदोलनाला नौटंकी आणि असत्याचा फॅशन शो म्हटलं आहे, तर दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचं मात्र मान्य केलं आहे. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना आता बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रॅली आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Police : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha) वरून राजकारण तापले आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, दरम्यान यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनावेळी (Maratha Andolan) सर्वसामान्यांना झालेल्या त्रासामुळे आणि उच्च न्यायालयाच्या (High Court) नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलल्या जात होते. जर परवानगीशिवाय मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, तर आयोजकांवर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे या मोर्चाचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (MNS And Mahavikas Aghadi Demands)

1. मतदारयाद्या अद्ययावत करा.

2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.

3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

आणखी वाचा 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: सर्व निवडणुका सोबत लढवणार; Satej Patil, Vinayak Raut बैठकीला हजर
Railway Crackdown: CSMT स्टेशनवर आंदोलनावर कायमची बंदी, 'मोटारमन लॉबी'त आता No Protests
BMC Elections: भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली, 'रिपोर्ट कार्ड'च्या आधारावर तिकीट वाटप?
Land Scam Allegation: '200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली', Pratap Sarnaik यांच्यावर गंभीर आरोप
Mundhwa Land Scam: कंपनीत 99% भागीदारी, तरी Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही? विरोधकांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Land Scam: एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तोच व्यक्ती पार्थ पवारांच्या प्रकरणात सामील, आता हिशेब चुकता करणार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Devendra Fadnavis & Ajit Pawar: माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Embed widget