एक्स्प्लोर

बळीराजा चेतना योजनेच्या निधीचा गैरवापर

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार फक्त घोषणा करतं आणि त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही, याचं अजून एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या बळीराजा चेतना योजनेत दिलेला निधी वापरला गेला नाही. आणखी धक्कादायक म्हणजे याच योजनेचा निधी एका जिल्ह्यात तर वेगळ्याच कारणासाठी वापरला गेल्याचं समोर आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सरकारसाठी कळीचा विषय आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात जास्त आत्महत्या होतात, त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2015 मध्ये बळीराजा चेतना योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली. पण योजनेसाठी दिलेल्या निधीचा वापर हा शेतकऱ्यांसाठी कमी झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, या योजनेतील 3 कोटीहून अधिक खर्च जाहिरात, बॅनर्स, डॉक्युमेंट्री फिल्म, कार्यालयांसाठी खर्च झाल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव इथून इस्त्राईलला अभ्यास दौरा गेला, त्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. शेतकरी आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी अभ्यास दौऱ्यावर पैसे खर्च झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात निकषात बसत नाही म्हणून 237 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत नाकारली आहे आणि दुसरीकडे बळीराजा योजनेतील निधी योग्य कामासाठी वापरला जात नाही. यवतमाळ जिल्ह्यात 34 हजार 596 कुटुंबांना या योजनेखाली मदतीसाठी निवडण्यात आलं होतं. 1 हजार 848 गावात समित्या नेमण्यात आले, असं असूनही शेतकरी आत्महत्या थांबल्याच चित्र नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात तर दिलेला निधी खर्चच करण्यात आला नाही. या जिल्ह्यात 23 कोटी 40 लाख निधी पैकी फक्त 10 कोटी 76 लाख निधी वापरण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्यांवर मुंबईतील TISS या संस्थेला अभ्यास करण्यासाठी पण निधी दिला गेला. खरंतर TISS ला निधी देण्याची आवश्यकता नव्हती. शेतकऱ्यांसाठी सरकार नुसतं घोषणा करतं, पण त्या योजना कशा राबवायची हे यंत्रणेला माहित नाही किंवा दिलेला निधी हा योग्य कामासाठी वापरला जात. निधी पडून राहतो हे चित्र वारंवार दिसून येतं. या योजना आखूनही शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी का पडत याच उत्तर यामध्ये आहे. राज्य सरकार नुसतं लोकप्रिय घोषणा करतं, पण ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात, तिथवर काहीच पोहोचत नाही, हे विदारक चित्र बळीराजा योजनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन, मंत्री उदय सामंतांची शिष्टाई फळाला, आंदोलन स्थगित, मंत्री शिववेंद्राराजे यांच्यासोबत होणार बैठक 
नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन, मंत्री उदय सामंतांची शिष्टाई फळाला, आंदोलन स्थगित, मंत्री शिववेंद्राराजे यांच्यासोबत होणार बैठक 
Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
रायगडमध्ये भीषण अपघात! टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात! टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget