एक्स्प्लोर

कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील नवरदेवानं उडवला लग्नाचा बार; प्रशासनाची केवळ दंडात्मक कारवाई

कोरोना पॉझिटिव्ह असून देखील लग्न करणाऱ्या नवरदेवाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पण, असं असलं तरी लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्याचं काय हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.

रत्नागिरी : उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग! ही म्हण आपल्या सर्वांना माहित आहे. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात मात्र कोरोना पॉझिटिव्ह नवरा, गुडघ्याला बाशिंग असा प्रकार घडला आहे. कोरोना बाधित असताना देखील नवऱ्याला लग्न करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींच्या चिंतेत देखील भर पडली आहे. 

गुहागर तालुक्यातील सडे- जांभारी येथील तरुणाचा 4 मे रोजी कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. पण त्यानंतर देखील या तरुणाने बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. पाच मे रोजी या तरूणाने लग्न देखील केलं. शिवाय, कोरोना काळातील सारे नियम देखील मोडले. घडला प्रकार समोर आल्यानंतर मात्र शीर गावच्या ग्रामकृतीदलाची पुरती धावधाव झाली. त्यानंतर नवरदेवाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पण, असं असलं तरी लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्याचं काय हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. दरम्यान, जिल्ह्यातील सध्याची सारी परिस्थिती पाहता या नवरदेवाच्या उतावळीपणामुळे सध्या अनेक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. 


कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील नवरदेवानं उडवला लग्नाचा बार; प्रशासनाची केवळ दंडात्मक कारवाई

प्रशासनाचं दुर्लक्ष?

मुळात नवरदेवाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट हा 4 मे रोजी आला होता. असं असताना देखील त्याला रूग्णालयात दाखल का करण्यात आलं नाही? तब्बल 24 तासानंतर देखील आरोग्य यंत्रणा काय करत होती? लग्नाला 25 वऱ्हाडी बंधनकारक असून दोन तासात लग्नविधी संपवणे अपेक्षित आहे. असं असताना देखील या लग्नाना परवानगी का दिली गेली? शिवाय, कोरोना रिपोर्टनंतर आरोग्य यंत्रणेसह ग्रामकृती दल नेमकं काय करत होतं? यासारखे अनेक प्रश्न जनसामान्यांमधून विचारले जात आहे. 

तसेच केवळ 50 हजार रूपये दंड केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही? हा सवाल देखील अद्याप अनुत्तरीत आहे. यापुढे लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना शोधून काढत त्यांना क्वॉरंटाईन केलं जाणार का? त्यांची तपासणी केली जाणार का? याबाबत प्रशासनानं काय कारवाई अथवा काय निर्णय घेतला आहे? याबाबत देखील सध्या सवाल विचारले जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजाराच्या पार गेला आहे. मृतांची संख्या देखील वाढत आहे. या साऱ्या परिस्थितीत हलगर्जीपणा केल्यानं प्रशासन दोषी नाही का? याबाबत आता कुणाला जबाबदार ठरवणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil on Neet Exam: 'आंबा चोरला म्हणून फाशीची शिक्षा द्यायची नसते'; पेपरफुटीवरून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले...
'आंबा चोरला म्हणून फाशीची शिक्षा द्यायची नसते'; पेपरफुटीवरून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले...
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Maharashtra Rain : गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?
गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, घाटमाथ्यांसह कोकणाला अलर्ट जारी, IMD चा इशारा काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget