एक्स्प्लोर
साताऱ्यात प्रेमविवाहानंतर आठ दिवसात तरुणाची आत्महत्या
आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होता.

सातारा: नवविवाहित युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील निरसाळे गावात घडली आहे. आकाश मांढरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. निरसाळे गावात सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. झाडाला गळफास घेऊन आकाशने आपलं जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















