एक्स्प्लोर

Weather Update Monsoon: निम्मा जून उलटला, मान्सून कधी येणार? कोकण किनारपट्टीवर 'या' तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार

पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हवामानात बदल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather Update Monsoon: निम्मा जून उलटला तरी महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा थेंब आलेला नाही. (Weather Update) बहुतांश राज्यात मान्सूनची ओढ कायम आहे. अलनिनोच्या परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात अडकले आहेत. (Monsoon Maharashtra) गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकण तसेच पुढे आगेकूच करण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नाही. राज्यात अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात आले आहेत.त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना  उन्हाचा चटका असह्य झाला  आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हवामानात बदल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून दाखल होण्यास अजून किती वेळ?

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सून सहा जून रोजी तळकोकणात दाखल झाला. नानात्र 8 जूनला हर्णे आणि सोलापूरच्या पट्ट्यात मान्सूनने हजेरी लावली. त्यामुळे राज्यभरात आता लवकरच मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज लावलं जात होता. मात्र,प्रशांत महासागरात अलनिनोची अनुकूल परिस्थिती आणि पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम झाला. पण गेल्या आठवड्याभरापासून मान्सूनची प्रगती ठप्प आहे.22 ते 24 जूनच्या दरम्यान हवामान अनुकूल झाल्यास मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

पंजाबपासून बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा अद्याप सक्रिय आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याशिवाय, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या भागावर समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वेस्टर्न सबर्ब भागात काही भागांमध्ये पाऊस झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 25 जूनच्या  दरम्यान कोकण आणि मुंबईत  पावसाला पोषक वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात कुठे काय अलर्ट?

१८ जून : पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. 

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर पुणे जिल्ह्यात बिजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली जोरदार पावसाची शक्यता आहे . मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्रात उर्वरित काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

19 जून : मुंबई, पालघर, रत्नागिरी ,नाशिक,जळगाव संभाजीनगर, जालना, बीड ,सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला. रायगड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget