एक्स्प्लोर

नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी सोडलं

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.

नाशिक/अहमदनगर : पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान अखेर भागणार आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आज सकाळपासून जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील सात ते आठ दिवस हे आवर्तन चालणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे. मुळा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु अहमदनगरमधील भंडारदरा आणि मुळा धरणातून जायकवाडी साठी 5.75 टीएमसी इतके पाणी सोडले जाणार आहे. यात मुळा धरणातून आज 1.90 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा धरणाच्या 11 दरवाज्यातून 6 हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले. पाण्याचा वेग आठ तासानंतर 8 हजार क्यूसेत तर रात्री बारा वाजता 12 हजार क्यूसेक असा वाढवला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ठरल्याप्रमाणे एकूण 1.90 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणावर चार बंधारे असून या ठिकाणी पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे, तसेच जवळपास 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर निळवंडे धरणातूनही मराठवाड्याच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरु झाला आहे. पाच दरवाज्यातून 6000 क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं. प्रवरा नदीतून 150 किमी असा पाण्याचा प्रवास असेल. नाशिकमधूनही पाणी सोडलं याशिवाय नाशिकमधील दारणा धरणातून 3000 क्यूसेक, मुकणे धरणातून 1000 क्यूसेक आणि गंगापूर धरणातून प्रती सेकंद 1000  क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणांमधून दोन दिवस पाणी सोडलं जाणार आहे. तसंच पाणीचोरी होणार नाही, अशी उपाययोजनाही करण्यात आली आहे. हे पाणी प्रवरा संगममध्ये पोहोचायला 24 तास लागणार आहेत. तर पाणी नाशिकहून जायकवाडीला पोहोचायला अंदाजे अडीच दिवस लागतील. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच तीनही धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान स्थानिकांचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. पाणी सोडताना कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे धरणावर तसंच पाणी प्रवाहित मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त असेल. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पाणी चोरी रोखण्यासाठी मार्गावरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. एकूण किती पाणी सोडणार? जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget