एक्स्प्लोर

सुमंगलाताईंच्या ‘वॉटर बँके’मुळे सोलापुरातील अंकोलीत जलसमृद्धी

सोलापूर : सध्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातल्या महिलांना पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावोगावच्या महिला घागरभर पाण्यासाठी अक्षरशः घाम गाळताना दिसत आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांची पाण्यासाठीची भटकंती दूर करण्यासाठी पुढे सरसावली आहे सोलापुरातली एक महिला.   पाण्याने तुडुंब भरलेल्या आपल्या वाटर बँकेतून ही महिला संपूर्ण गावाला पाणी देण्याचं मोठं काम करते आहे. दुष्काळी परिस्थितीतही कोट्यावधी लिटर पाणीसाठा असलेली ही महिला आता गावासाठी ‘पाणीवाली बाई’ ठरली आहे.   सुमंगलाताईंची वॉटर बँकेची संकल्पना   सुमंगला देशपांडे... सोलापूर जिल्ह्यातल्या अंकोली गावातल्या शेतकरी कुटुंबातली एक महिला. शेतात राहून त्यांनी वॉटर बँकेसारखी अत्यंत उपयुक्त संकल्पना राबवली. सध्या सगळीकडचे जलस्त्रोत आटले असतानाही त्यांच्याकडे 3 कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. त्यांच्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानोरान भटकण्याची वेळ आली आहे. महिलांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून सुमंगलाताईंनी त्यांच्या वॉटर बँकेतून गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ट्यांकरच्या माध्यमातून गावाला रोज 30 हजार लिटर पाणी त्या देत आहेत. वॉटर बँकेतून जलसमृद्धी! ज्या गावात राहून त्यांनी वॉटर बँक स्थापन करून जलसमृद्धी मिळवली त्याच कारण म्हणजे ही वॉटर बँके. त्याहून महत्वाच कारण म्हणजे या बँकेवर असलेली महिलांची मालकी. या वॉटर बँकेची संपूर्ण मालकी महिला सभासदांची आहे. ज्या अंकोली गावात दुष्काळ पडला आहे त्याच गावात या वाटर बँकेने महिला सभासदांना स्वावलंबन बहाल केलं आहे.   आणि पाण्यासाठी वणवण थांबली!   वॉटर बँकेतून रोज दोन टँकरच्या माध्यमातून गावाला पिण्याचं पाणी देण्यात येत आहे. गावातल्या महिलांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून एका महिलेने आपली पाण्याची बँक खुली केली. यामुळेच आज गावच्या महिलांची भटकंती थांबली. किमान गावातल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठीची तरी सोय झाली आहे.   वॉटर बँकेत 30 कोटी लिटर पाणी डीपॉझिट! गावागावात वॉटर बँका निर्माण करून त्याची मालकी स्त्रियांच्या हाती दिली जावी. याचा पायलट प्रोजेक्ट म्हणजे अंकोलीची ही जलसंपन्न वॉटर बँक. प्रत्येक वर्षी या बँकेत 30 कोटी लिटर पाणी डीपॉझिट होतं. 25 कोटी लिटर पाणी वापरलं जातं आणि 5 कोटी लिटर पाणी कायमस्वरूपी बँकेत जमा असतं. अडचणीच्या काळात याचा वापर केला जातो. आज अंकोली गावाला पाणी टंचाईन ग्रासलं असल्याने या बँकेतून पाणी दिल जातं आहे. वॉटर बँकेची चावी महिलांच्या हाती!   पाण्याचा भरमसाठ उपसा झाल्यानेच दुष्काळी परिस्थितीला सामोर जाव लागत. हेच पाणी स्त्रियांच्या मालकीच केल तर त्याचा योग्य वापर होतो. पाण्याची मालकी स्त्रियांच्या हाती असावी, हा वॉटर बँकेचा दंडक आहे. कारण महिला काटकसरीने पाण्याचा वापर करतात. पाण्याची बचत स्त्रियांकडून अधिक प्रमाणात होऊ शकते. दुष्काळी परिस्थितीतही ग्रामीण महिला पाण्याच्या बाबतीत श्रीमंत राहतील हे अंकोलीच्या वॉटर बँकेने सप्रमाण सिद्ध केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget