एक्स्प्लोर

शेतकऱ्याचा पाय खोलात! आधी कोरोना अन् आता गारपीट

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट होत आहे. आधीच कोरोना व्हायरसमुळे निर्यातबंदी असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतीमाल पडून आहे. अशातच अवकाळी पावसाने फळबागांचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

मुंबई : अवकाळी पावसासारख्या अस्मानी संकटावर मात करुन पिकवलेल्या फळबागा हातातोंडाशी आलेल्या असताना बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट झाली. त्यामुळे अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्ष, डाळींब, केळी बागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सांगली, जळगाव, वाशिम, हिंगोली, धुळे, यवतमाळसह अन्य काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसासह गारपीट झाली. परिणामी हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तर, देशात आलेल्या कोरोना व्हायरसमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सध्या निर्यातबंदी करण्यात आलीय. त्यामुळे अनेक बाजारसमीत्यांमध्ये शेतीमाल पडून आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर परिसरात गेल्या पाच ते सात वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. मात्र, अवकाळी पावसात गारा पडण्याचे प्रमाण या दोन ते तीन वर्षांत वाढले आहे. द्राक्ष काढणी हंगाम आणि अवकाळी पाऊस हे समीकरण बनल्याचे चित्र या पावसामुळे बनले आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात खानापूर, बेणापूर, हिवरे, सुलतानगादे परिसरात हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्षबागा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान द्राक्षांवर रोग पडण्याची शक्यता खानापूर घाटमाथ्यावर सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू आहे. निर्यातक्षम द्राक्षांसह स्थानिक बाजारपेठेसाठीच्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. सध्या हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेकडो एकर द्राक्षे निर्यात होणार आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी साठून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या द्राक्ष घडामध्ये साखर आली आहे, अशा बागांची काढणी होणार होती. त्यांची साखर कमी झाल्याने काढणी पुन्हा साखर येईपर्यंत पुढे ढकलली जाणार आहे. द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात खानापूर, बलवडी, पळशी, हिवरे, मोही, गोरेवाडी, बेनापूर, सुलतानगादे या गावातील निर्यातक्षम द्राक्षांची काढणी झाली नसून या बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर, वाशिम जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांना ही मोठा फटका बसल्याचं चित्र समोर आलंय. या गारपीटीचा फटका वाशिम बाजारसमिती समोर असलेल्या पिंपळाच्या वृक्षावर वास्तव करणाऱ्या पोपटांना बसला. या गारपीटीत शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पक्षी जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद; देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले... हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा, हिंगोली या पाचही तालुक्यामध्ये अवकाळी पावसात सोबतच गारांचा पाऊस पडला. यामध्ये शेतातील, गहू, हरभरा, भाजीपाला यासह बागायत संत्रा, मोसंबीला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. दहा वाजता अचानक झालेल्या गारपीटीने सर्व जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीमुळे संकटात सापडला आहे. कापून ठेवलेले गहू, हरभरा, तसेच उकळून ठेवलेली हळद झाकण्यासाठी मध्यरात्रीच धांदळ उडाली. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने घराकडे परतण्याच्या गडबडीमध्ये अनेक ठिकाणी अपघात घडण्याच्या घटना घडल्या. तसेच काही गावातील विद्युत तारा तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना रात्र अंधारातच जागून काढावी लागली. तर, बीड जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकाचे मोठं नुकसान झालय. अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने हरभरा, गहू आणि ज्वारी काढण्याच्या कामाचा विचका झाला. अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव परिसरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. Coronavirus Update | मुंबई, पिंपरी, रत्नागिरीत तीन रुग्ण आढळले, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 वर जळगाव जिल्ह्यात फळबागांना फटका जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे, पोहरे दंस्केबर्डी, नावरे, बहाळचा काही भाग याठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यात लिंबू बागा अक्षरशः मोडून पडल्या आहेत. गुढे परिसरात सर्वाधिक लिंबूचे उत्पादन घेतलं जातं. यात यावर्षी जास्त प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे लिंबू बागांना फटका बसला होता. त्यातच आज गारपीटीने अधिक भर पाडून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबरोबर गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला मातीमोल झाला आहे. गुढ्यात पावसापेक्षा गाराच जास्त पडत होत्या. शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Rain in Maharashtra | राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, पीकांचं मोठं नुकसान
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget