एक्स्प्लोर

Unlock 4 | ई पास रद्द केल्यानंतर आता आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू

मध्य रेल्वेने उद्यापासून रेल्वेचे आरक्षण देखील सुरू केले आहे. भारतीय रेल्वेवर सध्या ज्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत, त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार आहे.

मुंबई : राज्यात आता आंतरजिल्हा रेल्वे वाहतुकीला देखील परवानगी देण्यात आली आहे. कालच राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यामध्ये आंतरजिल्हा रस्ते प्रवासा वरील निर्बंध उठवण्यात आले होते. तर आज रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आल्याने, आता रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीचा पर्याय देखील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.

काल राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनची नियमावली जाहीर केल्यानंतर आंतरजिल्हा रस्ते वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे वाहतूक कधी सुरू होणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक इतर राज्यात सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे 22 मार्चपासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसत होता. ही वाहतूक सुरू व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम होती. मात्र कालच्या नव्या नियमावली नंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्याने मध्य रेल्वेने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करायचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या 200 स्पेशल ट्रेन संपूर्ण भारतात धावत आहेत केवळ याच ट्रेनचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. तसेच ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस सुरू आहेत त्यांचाही वापर प्रवाशांना करता येईल. इतर ट्रेनच्या सुविधा अजूनही उपलब्ध नसतील.

Unlock 4 | ई पास रद्द केल्यानंतर आता आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू

मध्य रेल्वेने लिहिलेल्या एका पत्रकात राज्य सरकारला ही वाहतूक सुरू करत असल्याचे कळवले आहे. आंतरजिल्हा म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेने आता जाता येणार आहे. या रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट आरक्षित करावी लागेल. हे तिकिटांचे आरक्षण 2 सप्टेंबरपासून मध्य रेल्वे सुरू करणार आहे. मात्र हा प्रवास करत असताना काही नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा लागेल. ज्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे केवळ त्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करता येईल. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.
आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असली तरी मुंबई आणि आसपासच्या शहरातील लोकांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. कारण लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. त्याबाबत कधी निर्णय होणार आणि लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सोबत केंद्रसरकारने मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र सरकारने त्यावर देखील अजूनही बंदी ठेवली आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना लोकल आणि मेट्रो चा वापर करण्यास अजूनही वाट पाहावी लागेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Embed widget