एक्स्प्लोर

राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, त्यांचे पासपोर्ट रद्द करा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. त्यांचे पासपोर्ट रद्द केले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale नागपूर : आरक्षण कोणीही हटवू शकत नाही. राहुल गांधी मात्र आरक्षण हटवू शकतात. तसेच ते देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. मी तर मागणी करतो त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजे. राहुल गांधींच्या विरोधात देशभर निषेध आंदोलन झाले आहेत.  त्यांचे जीभ छाटली पाहिजे, असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

मला मोदी सरकारमध्ये तीन वेळा मंत्रीपद मिळाले, हे कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. मला रिपब्लिकन पँथरच्या काळापासून नागपूर आणि विदर्भाने भक्कम साथ दिली. सध्या ज्या सरकार मध्ये मी आहे, ते पाच वर्ष चालणारे सरकार असून पूर्ण बहुमत आपल्याकडे आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत असून पुढे ही ते सोबत राहतील. पूर्वीही असे सरकार चालले आहे. आम्हाला विदर्भात कमी जागा मिळाल्या, तो भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, जागा मिळाल्या नाही. मराठवाड्यात ही यश आले नाही.

सविधान बदलले जाईल या चर्चेमुळे असे घडले. मात्र, इथे आंबेडकरी विचार भक्कम आहे. मोदी यांनी संविधानाला डोकं टेकवून शपथ घेतली आहे. लंडनचे घर असो, इंदु मिलचे काम असो, सर्वात मोदींचे योगदान आहे. त्यांच्या काळात हे काम झाले असताना मोदी कधी ही संविधान बदलणार नाही. असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केला आहे.  

मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकात कधी मुख्यमंत्रीही झाले नाही

मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस पक्षाने कधी कर्नाटकात मुख्यमंत्री केले नाही. खरगे म्हणतात आमचे सरकार आले असते तर NDA चे सर्व नेते आत राहिले असते. आता NDA चे सरकार असताना तुम्ही आणि तुमच्या पक्षातील सर्व नेते बाहेर आहे. त्यामुळे खोटे प्रचार करू नका,असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले. 

फडणवीस हे चतुर नेते आहेत - रामदास आठवले

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान 10 ते 12 जागा द्याव्या. माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत. वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाही. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्या. सोबतच विदर्भात किमान 4 जागा द्याव्या, अशी मागणीही मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा आम्हाला द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मागू नये. तर भाजप, शिंदे आणि अजित दादा या तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4-4 जागा द्याव्या. म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील, असेही ते म्हणाले. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ तरी द्याव्या.  किंबहुना फडणवीस हे चतुर नेते आहे. ते आमची ताकत ओळखतील. असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget