एक्स्प्लोर

राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील, उमेश पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, निष्ठेला महत्व नाही तर मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? 

निष्टेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? असा सवाल करत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केला. आता भाजपमध्ये बेशिस्त होणार नाही याची काळजी लागल्याचे ते म्हणाले.

Umesh Patil on Rajan Patil :  सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्टेला महत्व नाही असं म्हटलं गेलं. पण मला या व्यक्तीची गंमत वाटते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil ) यांनी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर टीका केली. निष्टेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? असा सवालही उमेश पाटील यांनी केला. मला आता भाजपमध्ये बेशिस्त होणार नाही याची काळजी लागली आहे. जगातला पृथ्वीतलावरचा चांगला माणूस घेतलाय असा टोला देखील उमेश पाटलांनी राजन पाटील यांना लगावला.

यशवंत माने यांना फारसं महत्व नाही, स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही

केवळ दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं चार माजी आमदार म्हणून गफलत केली जात आहे. यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्याचे नाहीत. ते व्यावसायिक आहेत ठेकदार आहेत. राजन पाटील याना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं महत्व नाही. स्वतःची ग्रामपंचायतही त्यांच्या ताब्यात नाही. त्यामुळं अशा माणसाच्या प्रवेशाला महत्व देण्याची आवश्यकता नसल्याची टीका उमेश पाटील यांनी यशवंत माने यांच्यावर केली. राजन पाटलांनी इंदापूरच्या माणसाला (यशवंत माने) आमचा तालुका ठेक्याने विकला होता. आता हा तालुका ठेकेदारीतून मुक्त झाल्याची टीका देखील उमेश पाटलांनी केली. 

तुमच्याकडे सगळं असताना लोकांनी तुम्हाला का नाकारलं? 

राजन पाटील हे लोकानेते होते, पण त्यांनी आत लोकमत गमावलं आहे. माझा लहान माणूस म्हणून उल्लेख करतात. हो मी लहान आहे. कारण माझ्याकडे साखर कारखाना, शिक्षणसंस्था, बँका ताब्यात नहीत. पण तुमच्याकडे सगळं असताना लोकांनी तुम्हाला का नाकारलं? असा टोला देखील उमेश पाटलांनी राजन पाटलांना लगावला. ते आज भाजपमध्ये गेलेत त्यामुळे आता आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे उमेश पाटील म्हणाले. राजन पाटलांच्या एका मुलाने आठ महिन्यापूर्वीच भाजपत ऑनलाईन प्रवेश केला आहे. त्यामुळं उगाच माझ्यावर खापर फोडून फायदा नाही. तुम्ही जिल्हा भाजपमय करणार म्हणता तुम्ही तुमचा तालुका टिकवू शकला नाही, असा टोला देखील उमेश पाटलांनी लगावला.  

भाजप स्वतंत्र लढणार असेल तर आम्ही शिंदे गटासोबत काही ठिकाणी तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू 

बबनदादा शिंदे यांच्या मुलाने सांगितलं आहे की वडिलांना विचारुन केलं आहे. पण याबाबत बबनदादा शिंदे यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा तांत्रिक विषय असल्याचे उमेश पाटील म्हणाले. भाजपच्या आमदारांनी स्वबळाचं नारा दिलाय आहे. आम्ही एकत्रित लढण्याचा विचार करत होतो. पण भाजपचा विचार एकटं लढण्याचा असेल तर मग आम्ही शिंदे गटासोबत काही ठिकाणी तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू असे उमेश पाटील म्हणाले. 

राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील 

जर आम्ही खोट बोलणारे असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं असे उमेश पाटील म्हणाले. तालुक्यातील लोकं यांच्या गुंडगिरी कंटाळली होती. शिस्तप्रिय असलेल्या पक्षात ही गुंडगिरी चालणार आहे का? असा सवाल करत  उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केली. इतका विद्वान माणूस पक्षात घेतलाय, त्याला रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचा प्राचार्य केलं पाहिजे. शिव्यावर पुस्तक लिहिणारा हा माणूस आहे, त्याच्याकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे. 
लग्नाच्या आधी मुलं कसं जन्माला घालतात? याची माहिती केवळ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनाच आहे. त्यामुळं इतका विद्वान माणूस त्यांनी पक्षात घेतला आहे असे पाटील म्हणाले. 

झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार? 

एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेतलेलं राज्य पाहत असतं. त्याचे लोण राज्यभर पुन्हा पसरेल. लोकांना हा प्रवेश आवडला की नाही हे निवडणुका नंतर समजेल असे उमेश पाटील म्हणाले. जायचं ज्यांनी ठरवलं आहे त्यांना थांबवन शक्यच नसतं. झोपेच सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार? असा सवाल देखील पाटील यांनी केला.  चार महिने आधीच यांनी पक्ष सदस्य घेतलेलं होतं असे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Rajan Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा शिस्तीचे, पण पक्षात बेशिस्तपणा; राजन पाटलांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget