एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उद्याच होण्याची शक्यता

सध्या महाराष्ट्र विकास आघाडीकडे सध्या शिवसेनेचे 54, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहे. तसेच अपक्ष आमदारांचा देखील आघाडीला पाठींबा आहे. तिन्ही प्रमुख पक्ष आणि अपक्ष 162 आमदारांनी मुंबईतील ग्रँड हयातमध्ये ओळखपरेड केली होती. परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचं हे शक्तीप्रदर्शन होतं. याद्वारे भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता.

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र विकासआघाडीचं सरकार उद्याच बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे. काँग्रेस–राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. विधानसभा अध्यक्षपदावरून दोन्ही पक्षात धुसफूस सुरु आहे. महाविकासआघाडीच्या सत्तावाटपात काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याचा निर्णय बुधवारी झाला, मात्र काल सकाळी अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा बदलणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतलीय.. त्यामुळे दोन्ही पक्षातली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सध्या महाराष्ट्र विकास आघाडीकडे सध्या शिवसेनेचे 54, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहे. तसेच अपक्ष आमदारांचा देखील आघाडीला पाठींबा आहे. तिन्ही प्रमुख पक्ष आणि अपक्ष 162 आमदारांनी मुंबईतील ग्रँड हयातमध्ये ओळखपरेड केली होती. परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचं हे शक्तीप्रदर्शन होतं. याद्वारे भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. शक्तीप्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बहुमत चाचणी म्हणजे काय? कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात. यासाठी विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं. सभागृहात सर्वात मोठा पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतो. निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. कारण, मतदान करायचं की नाही, याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. जेवढ्या आमदारांनी मतदान केलं, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो. बहुमत चाचणीत आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असतो. मात्र सर्वमान्य पद्धत ही हात उंचावून आपली पसंती दाखवण्याची आहे. महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला होता. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होत. मंगळवार (26 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयाने हा आदेश दिला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: 55 वर्षांचे प्रसाद लाड 44 वर्षांच्या मनोज जरांगेंना मोठे भाऊ, दादा-दादा म्हणत राहिले, फडणवीसांची बाजू मांडताना म्हणाले....
55 वर्षांचे प्रसाद लाड 44 वर्षांच्या मनोज जरांगेंना मोठे भाऊ, दादा-दादा म्हणत राहिले, फडणवीसांची बाजू मांडताना म्हणाले....
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Embed widget