एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray Live : मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरुनही अनेक शिवसैनिक सभास्थळी आले आहेत.

Key Events
Uddhav Thackeray Maharashtra CM Speech aurangabad live updates today shiv sena  rally sanjay raut sabha renaming sambhaji nagar water issue rajya sabha election bjp CM Uddhav Thackeray Live : मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा : उद्धव ठाकरे
Udhhav Thackeray Aurangabad Sabha Live

Background

Shiv Sena CM Uddhav Thackeray Rally Today : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. तब्बल 15 अटी शर्थींसह मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये (Aurangabad) 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. 

आजच्या सभेतच मुख्यमंत्री औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादमधील ज्या मैदानावर पार पडणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. तर 8 मे 1988 मध्ये याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादच संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच नेते संभाजीनगर असाच उल्लेख करतात. त्यामुळे बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची (Sambhajinagar) घोषणा करू शकतात, असं म्हटलं जात आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेच्या निमित्तानं आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे, सभेच्या स्टेजसमोर उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. शिवसेनेच्या सभेत पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत औरंगाबादचं नामांतर करत संभाजीनगर झाल्याची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. 

निवडणूक आणि नामांतराचा मुद्दा... महत्त्व काय? 

निवडणुका आल्या की महाराष्ट्रात एक विषय हमखास चर्चिला जातो. आणि तो इतका हॉट आणि हिट होतो, की तिच्यावर सगळेच राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलायला लागतात. तो विषय म्हणजे संभाजीनगर की औरंगाबाद. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्याशिवाय होऊच शकत नाही. अनेक वर्षे या मुद्यावरून महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुद्धा नामांतराच्या विषय आघाडीवर असण्याची शक्यता आहे.

सभेसाठी 'या' अटी-शर्थी :

जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये, अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण आणि नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील,यासह एकूण 15 अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे

20:54 PM (IST)  •  08 Jun 2022

सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली? : उद्धव ठाकरे

एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्‍यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो, कारण हिंदुत्ववादी. 25-30 वर्षे तुम्हीं आमचा उपयोग करुन घेतला आणि सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली?

20:53 PM (IST)  •  08 Jun 2022

Uddhav Thackeray Sabha : 25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला. 

Uddhav Thackeray Sabha : 25 वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर  बसले आहे. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले.  25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Phaltan Case डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं की हत्या? विरोधकांचा आरोप; फलटण प्रकरणात ट्विस्ट
Zero Hour : आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीनं घेतल्या जाव्यात; जनतेचा कौल काय?
Pune Land Row Zero Hour : जैन बोर्डिंगच्या वादाला नवं वळण, पालिका निवडणुकीत मुद्दा तापणार?
Zero Hour Voter List Row : मतदार याद्यांवरुन रणकंदन, विरोधकांचे गंभीर आरोप
Legacy Politics: 'मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे', Pankaja Munde यांचे वारसदाराच्या वादावर थेट विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
Embed widget