एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पीक विम्याबाबतच्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे. या गोंधळात बीडमध्ये आणखी एक अफवा पसरवली जात आहे. पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 करण्यात आली असल्याचे मेसेज फिरत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पीक विमा योजनेची मुदत सरकारने वाढवलेली नाही.
![पीक विम्याबाबतच्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? Tructh Behind Crop Insurances Fake Message Latest Updates पीक विम्याबाबतच्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/08192156/Crop_Insurance.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे. या गोंधळात बीडसह अनेक जिल्ह्यात आणखी एक अफवा पसरवली जात आहे. पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 करण्यात आली असल्याचे मेसेज फिरत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पीक विमा योजनेची मुदत सरकारने वाढवलेली नाही.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?
“प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी प्रधानमंत्री पीक विमा अर्ज करण्याची तारीख 10 ऑगस्ट 2017 केल्याचे सांगितले आहे.”मेसेजचं सत्य काय? पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट करण्यात आली असल्याची माहिती देणारा मेसेज खोटा असून, अद्याप तारखेत कोणतेही बदल करण्यात आले नाही. आणखी 15 दिवसांच्या अवधीसाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती पीक विमा भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची वाढ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला विनंती केली आहे. मात्र, अद्याप केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बँकांबाहेर लोकांच्या रांगा राज्यातल्या शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळतेय..कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईनच्या घोळामुळं ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. विरोधकही आक्रमक पीक विम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना विधानसभेत चांगलंच धारेवर धरलं. शेतकरी रांगेत तात्कळत असताना सरकार काहीच करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ताबडतोब मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विखेंनी केली. तर आज संध्याकाळपर्यंत पीक विम्याची मुदत वाढली नाही मी स्वत: दिल्लीला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. याशिवाय बँकेच्या रांगेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत कृषीमंत्र्यांनी जाहिर केली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)