मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा प्रतिसाद, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 'टास्क फोर्स' सज्ज
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर राज्यातील वाढता मृत्यू दर हा देखील चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांच्या पातळीवर मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर्स राज्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असणार आहे.
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आज या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करण्याच्या कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्रात आतापर्यंत 2334 पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 मृत्यू आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते. राज्यातला वाढता मृत्यू दर चिंतेचा विषय असून तो कमी करणे नव्हे तर एकही व्यक्ती मरण पावली नाही पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. टास्क फोर्समध्ये असणाऱ्या डॉक्टरांची यादी
डॉ.संजय ओक, डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय
डॉ . नागांवकर, लिलावती रुग्णालय
डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय
डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय
डॉ . एन.डी. कर्णिक, लोकमान्य टिळक रुग्णालय, शिव
डॉ . झहिर विरानी , पी . ए .के. रुग्णालय
डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय
डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय
ही टीम राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शनही करणार आहे. तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉट लाईनवर सहाय्य करणे, डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर ही टीम देखरेख ठेवणार आहे.
संबंधित बातम्या :
महावितरणच्या ग्राहकांना दिलासा; मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
अन्न, नागरी पुरवठा विभागाची सर्वात मोठी कारवाई; वाशी मार्केटमध्ये दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
Before You Go
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
महत्त्वाच्या बातम्या





















