एक्स्प्लोर
Advertisement
रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस
रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतला त्याचं नेमकं कारण सांगू शकत नाही, मात्र ते तोडपाणी करण्यात कमी पडले असावेत, असा टोला सुरेश धस यांनी लगावला.
उस्मानाबाद : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावेत, असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार सुरेश धस यांनी टोला लगावला आहे. त्यांनी नाव न घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
''रमेश कराड यांनी फॉर्म का मागे घेतला, याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. मात्र निवडणुकीच्या फॉर्मात रमेश कराड यांची एकूण संपत्ती पाच कोटी आहे आणि राष्ट्रवादीने आत्ता जो उमदेवार ठरवला आहे, त्यांची संपत्ती 74 कोटी आहे. त्यामुळे रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावेत,'' असं सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ''धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन आता कुणीही राष्ट्रवादीत जाणार नाही. उमेदवार निवडून येईल किंवा काहीही होईल, पण तुमच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या माणसाला तुम्ही असं सोडून दिलं तर कोण विश्वास ठेवेल?'' असा सवाल करत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.
''राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे गोंधळलेला आहे. पक्ष कोण चालवतंय तेच कळत नाही. 1985 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांचं तिकीट कापून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं,'' असंही सुरेश धस म्हणाले.
रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे.
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.
संबंधित बातम्या :
पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?
आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे
विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement