एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन, निकृष्ट जेवण देत असल्याचा आरोप

अहमदनगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जाचं जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आज मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.

संगमनेर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जांचं जेवण देत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. ठेकेदारावर ठोस कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. नाशिकचे विभागीय अप्पर आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र विद्यार्थ्यांनी पत्र घेण्यास नकार दिला आणि विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. निकृष्ट अन्न मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. या वस्तीगृहातील सुमारे 250 मुलं अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत. राजूर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे हे देखील मुलांशी चर्चा करण्यासाठी वसतीगृहात आले होते. मात्र मुलांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास नकार दिला होता. संतप्त विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील गेटलाच टाळं ठोकलं होतं.

दरम्यान नाशिक आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, आमदार सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली. परंतु त्या बैठकीतही ठोस आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. तर अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवत ठेकेदार पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आवाज तिसरा दिवस आहे. अद्यापही तोडगा निघत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आज मागण्या मान्य झाल्या नाही, तर अन्नत्याग आंदोलना बरोबर रस्त्यावर उतरुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget