एक्स्प्लोर
MPSC पास होऊनही नोकरी नाही, 65 उमेदवारांचं साखळी उपोषण

मुंबईः एमपीएससीची परीक्षा पास होऊनही शासकीय सेवेत सामावून न घेतलेल्या 65 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषण सुरु केलं आहे. परीक्षेत यश मिळवूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे या तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2 वर्षांपूर्वी 87 उमेदवारांची अधिव्याख्याता इंग्रजी आणि शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक पदांवर निवड झाली होती. यापैकी 22 जणांना नियुक्ती देण्यात आली. तर उरलेले अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड होऊन 2 वर्ष उलटल्याने या उमेदवारांचं मोठं नुकसान होतं आहे. ते भरुन मिळावं आणि लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी हे उपोषण केलं जातं आहे.
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















