एक्स्प्लोर

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने नवं वळण घेतलं आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेने संपातून माघार घेतल्याचं जाहीर केल्यामुळे अनेक संपकरी आक्रमक झाले असून संपात फूट पडल्याची चर्चाही होत आहे.

ST Strike Update : मागील जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात या संपाने आज नवं वळण घेतलं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं सोमवारी (20 डिसेंबर) मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचे जाहीरही केले. पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्याने इतर संपकरी आक्रमक झाले असून हा संप अजूनही मागे घेतली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान गुजर यांनी संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याच्या चर्चेलाही उधान आलं आहे. 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे आणि अध्यक्ष अजय गुजर हे उपस्थित होते. दरम्य़ान जवळपास सहा तास चाललेल्या बैठकीनंतर परब यांनी दिलेल्या माहितीत, चर्चेतून प्रश्न सुटतील असं सांगत संप माग घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून संप मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवाय विलनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असून याबाबत राज्यसरकारशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

संपकरी आक्रमक

दरम्यान गुजर यांच्या संपातून माघार घेण्यानंतर आझाद मैदानात उपस्थित अनेक संपकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विलणीकरणाच्या मुद्द्याशिवाय संप मागे घेणार नाही. या एकमेव मागणीवर ठाम असल्य़ांचं अनेकांनी सांगतिलं. तसंच एका संतप्त महिला आंदोलकाने एक लाख संपकऱ्यांचा जीव गेला तरी आम्ही दुखवटा चालूच ठेवू असंही म्हटंल आहे. 

अनिल परब काय म्हणाले?

चर्चेनंतर अनिल परब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, 'ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. तसंच फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे. शिवाय आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकरणे तपासून त्याचा अहवाल तयार करुन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत  कर्मचाऱ्यांनी कामावर दाखल व्हावं, ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास बाहेरगावी असल्यानं उशीर होईल त्यांना एक दिवसाची सवलत देण्यात येईल. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कामावर यावं चर्चेतून प्रश्न सुटू शकतात.'

सदावर्ते आंदोलनावर ठाम

एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्ने सदावर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका सदावर्तेंनी घेतली आहे. त्यावर बोलताना अजय गुजर म्हणाले की, "आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, पण समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल, त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील बघू." दरम्यान याआधी कोर्टात सुनावणीदरम्यान 'अजय गुजर यांची किमान वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना नोंदणीकृत आहे मात्र मान्यताप्राप्त नाही. शिवाय याचे केवळ दोन सदस्य आहेत.' अशी माहिती कोर्टात सदावर्ते यांनी दिली होती.

संबंधित बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक
Maharashtra Live Blog Updates: दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget