एक्स्प्लोर

एसटी महामंडळातील तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार?

मागील काही दिवसांपासूनच एसटी महामंडळात याबाबत चर्चा होती. अखेर आज हा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनिय सूत्रांनी दिलीय. आता हा प्रस्ताव उद्या अंतिम मंजुरीसाठी राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

मुंबई : एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. कारण ही योजना 50 वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सध्या एसटी महामंडळात तब्बल 27 हजार कर्मचारी पन्नाशी पार केलेले आहेत. या निर्णयामुळे महामंडळाचे दरमहा जवळपास 100 कोटी रुपयांच्या पगाराची बचत होणार असली तरी स्वेच्छा निवृत्तीसाठीच्या निर्णयासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबत एसटी महामंडळ राज्य सरकारकडे निधी मागणार आहे. जर राज्य सरकारने निधी मंजूर केला तरच हा निर्णय होऊ शकणार आहे. आज या प्रस्तावावर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकींत शिक्कामोर्तब करण्यात आलं असून आता हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासूनच एसटी महामंडळात याबाबत चर्चा होती. अखेर आज हा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनिय सूत्रांनी दिलीय. आता हा प्रस्ताव उद्या अंतिम मंजुरीसाठी राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या योजनेसाठी तब्बल 1400 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मांडण्यात येऊ शकतो. कारण या योजनेमुळे शासनावर तब्बल 1400 कोटींचा भार येणार आहे. हा प्रस्ताव कर्मचारी वर्ग खात्याने केला होता. त्यानंतर तो उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक याना पाठवण्यात आला. त्यानंतर तो एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांच्या संमती नंतरच तो आज एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि मंजूर देखील करण्यात आला आणि आता तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, एसटीची स्वेच्छा निवृत्तीची ही योजना फसवी आणि तोकडी आहे. उतारवयात कामगारांना बेरोजगार करून उपासमारीची वेळ आणण्याचे षडयंत्र सध्या महामंडळाकडून रचण्यात येतं आहे. कारण आपला ऐन उमदीचा काळ ज्यांनी महामंडळासाठी दिला त्यांना केवळ तीन महिन्याचा पगार आणि उपदान देयकाची रक्कम देण्यात येणार आहे. महत्त्वाच म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन रूपात देण्यात येणारी रक्कम साडे तीन हजारांच्या पुढे नसते. त्यामुळे एसटी महामंडळाने या कर्मचाऱ्यांचा उतारवयाचा विचार करता दर वर्षाला 8 महिन्याचा पगार द्यावा. आणि स्वेच्छानिवृत्ती स्वेच्छेने असावी सक्तीने नको अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून केवळ 3 महिन्यांचा पगार देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही अन्यायकारक आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय सरसकट लागू करु नये. ऐच्छिक ठेवावा अन्यथा याविरोधात आम्ही आंदोलन उभं करु. प्रसंगी न्यायालयाचा देखील आधार घेऊ.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Embed widget