एक्स्प्लोर

कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या स्पेशल ट्रेन्सला थंड प्रतिसाद, पहिल्या ट्रेनमध्ये फक्त 30 प्रवाशी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कालपासून 162 ट्रेन सोडण्याच नियोजन केले आहे.यातील सुरुवातीच्या तीन ट्रेन्सला काल अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे.

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कालपासून 162 ट्रेन सोडण्याचं नियोजन केले आहे. यातील काही ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहेत. काल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन रात्री साडे आठ वाजता सुटली. या पूर्ण रेल्वेत फक्त 6 प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते. 18 डब्यांच्या या गाडीत काल फक्त 30 प्रवाशीच होते. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाकरता स्पेशल ट्रेन्स सोडण्याची घोषणा झाली आणि चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र या ट्रेन्सला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरीचं उदाहरण पाहायचं झालं तर पहिली ट्रेन कुर्ला - रत्नागिरी ज्यात रत्नागिरीला केवळ 11 प्रवाशी उतरले.  दुसरी  ट्रेन CSMT - सावंतवाडी ज्यातून रत्नागिरीत केवळ 14 प्रवाशी उतरले तर तिसरी ट्रेन CSMT - कुडाळ - सावंतवाडी यातून केवळ 3 प्रवाशी रत्नागिरी स्टेशनवर उतरले आहेत. पहिल्या ट्रेन्सला प्रतिसाद कमी मिळत असला तरी यापुढील ट्रेनला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. पण, चाकरमान्यांना परतीच्या प्रवाशाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकणात जाणाऱ्यांसाठी 'या' दिवसापासून धावणार कोकण रेल्वे!
मागील काही दिवसांपासून कोकणवासियांकरता कोकण रेल्वे सोडण्याच्या बातम्या येत होत्या. निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चारमान्यांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात होती. नेमका निर्णय कधी होणार? किती ट्रेन्स सुटणार? नियम काय असणार? याबाबतचं घोंगडं भिजत ठेवलेले होते. राज्य आणि केंद्र सरकारकडून याबाबत हिरवा कंदिल मिळाल्यानंतर या रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात अप आणि डाऊन अशा 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत.
 
कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या स्पेशल ट्रेन्सला थंड प्रतिसाद, पहिल्या ट्रेनमध्ये फक्त 30 प्रवाशी
काय असणार नियम?
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता ट्रेन्सनं प्रवास करण्याकरता काय नियम असणार याबाबत देखील उत्सुकता आहे. दरम्यान, अद्याप याबाबतची नियमावली समोर आलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक स्टेशनवर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी असणार असून ते येणाऱ्या प्रवाशांची माहिती किंवा त्यांची नोंद ठेवणार आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget