एक्स्प्लोर

उजनीचे पाणी पुन्हा पेटणार, इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर वातावरण तापले, पालकमंत्री भरणे म्हणाले... 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे.

पंढरपूर : कायम दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे. एका बाजूला कोरोनाचे जीवघेणे संकट आ वासून उभे असताना जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण सोलापूर जिल्हा यात होरपळून निघणार आहे. 

उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात किमी 169 येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याबाबत जलसंपदा विभागाने काढलेल्या पत्राने सध्या सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरला जाणार यावरून सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे. 

उजनी धरणातील पाण्यावर तसा बऱ्याच मंडळींनी डोळा ठेवल्याने मूळ उजनी धरणाच्या उभारणीतून विस्थापित झालेल्या विस्थापितांवर अन्याय झाल्याची भावना येथील धरणग्रस्त बोलून दाखवत आहेत. तर पालकमंत्र्यांनी पंढरपूर प्रचारात मंगळवेढ्याच्या दुष्काळी 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवायचे आश्वासन दिल्याची आठवण भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी करून दिली आहे. 

हा निर्णय जाहीर होताच करमाळा तालुक्यात सर्वात जास्त उद्रेक व्यक्त होऊ लागला असून या तालुक्यातील अनेक गावेच्या गावे धरण उभारणीत विस्थापित झाली असल्याने केत्तूर येथे शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी तर थेट पालकमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत त्याला उजनी जलाशयात जलसमाधी दिली. वास्तविक अजून उजनी धरणातून मराठवाड्याला द्यायचे 21 टीएमसी पाणीही दिले गेले नाही ना सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या अक्कलकोट , सांगोला , मंगळवेढा , दक्षिण सोलापूर , करमाळा व माढा या भागातील योजना पूर्ण झाल्या आहेत. 

अशा स्थितीत सध्या उजनी जलाशयात असणाऱ्या पाण्याचे 100 टक्के वाटप यापूर्वी झाले असताना हे पाणी कुठून उपलब्ध करणार असा सवाल शिवसेना आमदार शहाजी पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्याचे एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही असा पवित्र करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि दिग्विजय बगल यांनी घेतली आहे. या प्रश्नावर आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या आमदार खासदार यांनी एकत्र येत याला विरोध करावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान सर्व जिल्हा अंगावर येऊ लागल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही आणि तसे झाले तर राजकीय सन्यास घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मात्र असे असेल तर कोरोनाचे एवढे मोठे संकट सुरु असताना हा आदेश निघालाच कसा याचे उत्तर मात्र त्यांचेकडे नाही. उजनीच्या एकूण पाण्यामध्ये हे पाणीही धरूनच हिशोब झालेला असेल तर 5 टीएमसी पाणी शिल्लक राहणार याचे उत्तर जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

सुरुवातीला बारमाही असलेले उजनी धरणानंतर आठमाही झाले आणि आता तर याचा जास्तीतजास्त वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात सुरु असलेले शेकडो टँकर केवळ उजनीवर अवलंबून असतात. अशात जर हे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला तर आधीच तहानलेल्या सोलापूर जिल्ह्याचा घसा कायम तहानलेला राहणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget