धक्कादायक! हडपसर हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॅक्टरचा चक्काचूर, बार्शी तालुक्यात घडली घटना
सोलापुरातील बार्शी (Barshi) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यात हडपसर-हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे.
Solapur Barshi Accident : सोलापुरातील बार्शी (Barshi) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यात हडपसर-हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात (Hadapsar Hyderabad Railway Express and tractor accident) झाला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अपघात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. मात्र, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरात हा अपघात झाल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात किरकोळ असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे. रस्त्यावर असलेला फाटक न लावला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात ट्रॅक्टरचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या 10 दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या 10 दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशातील मिर्जापूर (Mirzapur) जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर (Railway Station) मोठा रेल्वे अपघात (train accident) झाला होता. कालका मेल (Kalka Mail) च्या धडकेत सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रेल्वे पटली क्रॉस करताना या भाविकांचा अपघात झाला होता. ही घटना इतकी भीषण होती की मृतदेहांच्या चिंधड्या उडल्याचं दिसून आलं होतं. सर्व प्रवासी कार्तिक पौर्णिमेसाठी (Kartik Purnima) गंगा स्नान करण्यासाठी आले होते. या दुर्घटनेनंतर स्टेशनवर काही काळ गोंधळ माजला होता. रेल्वे पोलिस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह हटवले होते. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, अनेकांनी रेल्वे प्रशासनावर (railway administration) बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गोमो-प्रयागराज एक्सप्रेस (Gomo Prayagraj Express) येथून उतरलेले प्रवासी चुकीच्या दिशेने रेल्वे लाईन पार करत होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून हावडा-कालका मेल (Howrah-Kalka Mail) वेगाने जात होती आणि या ट्रेनच्या धडकेत सहा भाविक जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे ओळखणे अवघड झाले होते. जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी (GRP and RPF personnel) काळजीपूर्वक शव गोळा करून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या:
























