एक्स्प्लोर

Sindhudurg Nagarpanchayat Election : कुडाळमध्ये नारायण राणेंना तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg Nagarpanchayat Election) चार पैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.

सिंधुदुर्ग : तळकोकणात चार नगरपंचायत या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. गेल्या निवडणुकीत एक उमेदवार असलेल्या देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपनेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर त्यांची सत्ता येईल.

कुडाळ नगरपंचायतीमध्येही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच अवघ्या एका जागेने घोळ घातला आहे. कुडाळ नगरपंचायतमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस यांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीच्या ताब्यात जाऊ शकते. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने मदतीचा हात पुढे केल्यास याठिकाणीही भाजपची सत्ता येऊ शकते किंवा आघाडीची सत्ता येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली. त्यामुळे आता कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालया समोरून वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक जात असताना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 

वाभवे वैभवववाडी नगरपंचायतची सत्ता भाजपने राखली आहे. आमदार नितेश राणेंनी याठिकाणी आपली सत्ता राखली आहे. वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजपला नऊ, शिवसेना पाच आणि अपक्ष उमेदवारांनी तीन जागांवर विजय मिळवला. वैभववाडीत भाजपचे नेते जयेंद्र रावराणे वैभववाडी पोलीस स्थानकात झाले. जयेंद्र रावराणे यांचा मुलगा रोहन रावराणे हा अपक्ष म्हणून निवडून आला. भाजपच्या रॅली सोबत त्याची ही विजयी मिरवणूक शहरातून काढली जात होती. त्यावेळी पोलिसांनी वाहनात केलेला विजयी रथ(टेम्पो)व साउंड सिस्टीमचा एक टेम्पो ताब्यात घेतला त्यामुळे वैभववाडी पोलीस स्थानकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.

कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. दीपक केसरकरांच्या ताब्यात असलेली कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता शिवसेना भाजप युतीकडे होती. मात्र आताच्या निवडणुकीत भाजपने 12, शिवसेना दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले. त्यामुळे दीपक केसारकरांना धक्का देत भाजपने कसई दोडामार्ग नगरपंचायत खेचून आणली.

जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपलं वर्चस्व असल्याचा दावा करत आहेत. चारही नगरपंचायत आपल्याकडे असतील असा दावा भाजप कडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून आपल्या ताब्यात दोन नगर पंचायत असल्याचा दावा करत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत मधील पक्षीय बलाबल 

जिल्ह्यातील चार नगरपंचायत एकूण जागा 68 

  • शिवसेना - 22
  • भाजप -  37 
  • कॉंग्रेस - 2 
  • राष्ट्रवादी - 2 
  • अपक्ष - 5

कुडाळ नगरपंचायत

  • शिवसेना - 7
  • भाजप - 8
  • काँग्रेस- 2
  • राष्ट्रवादी - ०
  • अपक्ष - ०
  • इतर - ०


देवगड जामसंडे नगरपंचायत

  • शिवसेना - 8
  • भाजप - 8
  • काँग्रेस- ०
  • राष्ट्रवादी - 1
  • अपक्ष - ०
  • इतर - ०

कसई दोडामार्ग नगरपंचायत

  • शिवसेना - 2
  • भाजप - 12
  • काँग्रेस - ०
  • राष्ट्रवादी - 1
  • अपक्ष - 2
  •  इतर - ०

वाभवे वैभववाडी नगरपंचायत

  • शिवसेना - 5
  • भाजप - 9
  • काँग्रेस - ०
  • राष्ट्रवादी - ०
  • अपक्ष - 3
  • इतर - ०

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget