एक्स्प्लोर

सोलापूर श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेवर निर्बंध; मंदिर परिसरात चार दिवसांची संचारबंदी

Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या (Siddheshwar Maharaj Yatra) पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 जानेवारी रात्री बारा वाजल्यापासून ते रविवार दि. 16 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात भाविक आणि नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, धार्मिक विधींकरिता जाणाऱ्या मानकऱ्यांना पोलीस आयुक्तालयाकडून प्रवेशपास घेणं आवश्यक असणार आहे. 

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 ते 16 जानेवारीपर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी असणार आहे. पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. विविध राज्यांतून भाविक सोलापुरात सिध्देश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यात्रेसाठी केवळ 50 मानकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यासर्व मानकऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं पासेस देण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना देखील पासेस देण्यात येणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हरिभाई देवकरण शाळेसमोरील रस्ता, भुईकोट किल्ला परिसर ते चार पुतळा असे चार ही बाजूने संचारबंदी लागू असणार आहे. त्यामुळे काळात सर्वसामान्य नागरिकांना या भागातील रस्त्यांचा वापर करता येणार नाहीये.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधींना सोमवारपासून प्रारंभ झाला. यात्रेला परवानगी देणं आणि प्रवेशपासवरून पुजारी, मानकरी यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. 500 जणांना पायी वारीची परवानगी द्या, अशी मागणी पुजारी आणि मानकऱ्यांनी केली होती. परंतु, प्रशासनानं केवळ 50 वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आदेश पारीत करत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्त बैजल यांनी काढलेल्या आदेशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्यानं शहर आणि जिह्यासह परराज्यांतील भाविकांना या ठिकाणी येण्यास परवानगी नाही.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन डिजिटल पास सक्तीचे करण्यात आले आहेत. यात्रेच्या धार्मिक विधींसाठी उपस्थित राहणारे पुजारी, नंदीध्वजांचे मानकरी यांना पोलीस प्रशासनाकडून प्रवेशपास घेणे बंधनकारक आहे. मैदानावर मनोरंजन-करमणुकीची दुकानं, पूजासाहित्य विक्री आणि अन्य दुकानं लावण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश यात दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget