एक्स्प्लोर

विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी केवळ 15 दिवसांत उभारला!

विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी एकीच्या बळावर केवळ 15 दिवसांत उभारला आहे. ग्रामस्थांनी लोकसभागाातून लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा श्रमसेतू तयार केला आहे.

यवतमाळ : विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी एकीच्या बळावर केवळ 15 दिवसांत पैनगंगा नदीवर तयार केला आहे .या भागातील ग्रामस्थांनी लोकसभागाातून लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा श्रमसेतू तयार करण्याची कीमया केली आहे. विदर्भातील पळशी आणि मराठवाडा येथील मनूला या गावाला या पुलाने जोडले आहे. या श्रमसेतुमुळे साधारण 30 गावं जोडली गेली असून 40 किलोमीटरचा फेरा या पुलामुळे वाचला आहे.शिवाय या पूल आणि बंधाऱ्यामुळे नदीपात्रात 3 किलोमीटर पाणी अडविले गेले. त्यामुळे 3 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला असून या भागातील विहिरींची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दोन्ही काठांवर राहणाऱ्या शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तींना या श्रमसेतुमुळे फायदा झाला आहे.

पूर्वी दोन्ही भागांतील नागरिकांना मोठा फेरा मारून यवतमाळ किंवा नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या गावांत जावे येणे करावे लागायचे. त्यात वेळ आणि पैसा अधिक लागायचा. शाळकरी विद्यार्थी यांना पावसाळ्यात तर पैनगंगा नदीतून पलीकडे असलेल्या शाळेत जाणे शक्य होत नव्हते. अनेकदा गावकऱ्यांनी शासन दरबारात या पूल निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा केला, मात्र काही झाले नाही. या भागांतील सामाजिक कार्यकर्ते चितांगराव कदम यांनी पुढाकार घेत गावकऱ्यांची मोट बांधली श्रमसेतू पूर्ण होईपर्यंत स्वतः नदीच्या पात्रात मुक्काम केला. दिवस रात्र आपल्या गावकऱ्यांच्या सोबतीने श्रमसेतू निर्माण केला. यावेळी ग्रामस्थांनी घरच्या भाकरी खात श्रमदान करीत पैनगंगेवर मजबूत असा श्रमसेतू तयार केला. कुठल्याही शासकीय मदती शिवाय श्रमसेतू (पूल) बांधला गेला. असे मनूला जिल्हा नांदेड येथील सुदर्शन जाधव आणि थुगराव जाधव यांनी सांगितले .

विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी केवळ 15 दिवसांत उभारला! विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी केवळ 15 दिवसांत उभारला!

गावकऱ्यांचा उत्साह कायम राखत दिवसभराच्या मेहनतीनंतर रात्री नदीपात्रात भजन कीर्तन केले गेले. शिवाय हा श्रमसेतू पूर्णत्वाकडे जात नाही. तोपर्यंत या जागेतून हलायचे नाही, असा ग्रामस्थांनी निश्चय केला आणि साधारण 15 दिवसात हा श्रमसेतू तयार झाला यासाठी गावकऱ्यांनी 15 लाख लोकवर्गणी जमा केली. सोबतीला मेहनतीची जोड दिली आणि आज हा पूल वाहतुकीसाठी तयार झाला आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीने हा पूल तयार झाला असे सामाजिक कार्यकर्ते चितांगराव कदम यांनी सांगितले.

गावातील सर्व आबालवृद्ध तरुण पिढीने श्रमसेतूसाठी झोकून देऊन काम केले त्यामुळेच हे शक्य झाले, असे पळशी येथील गजानन सोळंके यांनी सांगितले. याच कामाला शासन दरबारी पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षचा कालावधी लागला असता आणि करोडो रुपयांचा खर्च सुध्दा लागला असता मात्र गावकऱ्यांनी श्रमदान करून शिवाय 15 लाख लोकवर्गणीतून हा पूल बांधला. शेतकरी मजूर सर्वांनी यासाठी मेहनत घेतली आज हा श्रमसेतू गावकऱ्यांच्या एकीचे प्रतीक बनला आहे, असे विशाल माने आणि अविनाश खंदारे यांनी सांगितले आहे .श्रमसेतु पूर्ण होण्याच्या शेवटच्या दिवशीं येथे गावकऱ्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. त्यामुळे 'गाकरी ते राव न करी' असं या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी पाय रोवून हा पूल श्रमसेतू एकदिलाने उभा केला आहे. त्या गावकऱ्यांच्या एकीच प्रतिक हा श्रमसेतू झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget