एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भंडाऱ्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश
भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
![भंडाऱ्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश Shivsena Bhandara president joins BJP ahead of by poll भंडाऱ्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16100709/rajendra-patale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा : लोकसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर शिवसेनेला भंडाऱ्यात मोठा धक्का बसला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
नागपुरात राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपात प्रवेश केला.
दरम्यान, भाजपला भंडाऱ्यात पुन्हा पोवार समाजाचा नेता मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः भाजपला राजेंद्र पटले यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार आहेत.
कोण आहेत राजेंद्र पटले?
राजेंद्र पटले हे शिवसेनेचे भंडाऱ्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. त्याअगोदर ते किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक आंदोलनं केली. शिवसेनेत येण्याअगोदर पटले भाजपातच होते. मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली.
शिवसेनेकडून त्यांनी तुमसरमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र भाजपच्या चरण वाघमारे यांनी पटले यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेत ते भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष होते. पण पोटनिवडणुकीअगोदर त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे.
राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणूक
पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवड घेण्यात येणार आहे. तसंच पतंगराव कदमांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे, तर 31 मे रोजी मतमोजणी होईल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)