एक्स्प्लोर

लोकांना कृषी मंत्री माहित नाही, तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाही; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिन्नर तालुक्यातील सोनोरी या नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा केला.

नाशिक  : ओला दुष्काळ जाहीर करावा हीच आमची मागणी असून बांधावर गेल्यावर शेतकऱ्यांचे (Farmer) दुःख कळत आहे. लोकांना जसं कृषी मंत्री माहित नाहीत तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाहीत, ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) टोला लगावलाय.

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिन्नर तालुक्यातील सोनोरी या नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी बांधवांना मदत करणे गरजेचे आहे. पर्यावरण मंत्री होतो त्यामुळे  मला माहित आहे की वातावरण बदलामुळे अतिवृष्टी आणि अशी संकटे उभी राहत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बांधावर आल्यावर कळतं शेतकऱ्यांचं दुःख काय आहे. त्यामुळे खदखद बाहेर येते आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. लोकांना जसं कृषी मंत्री माहित नाही तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाहीत. ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

रस्त्यावर उतरण्याची गरज का आली हे त्यांना कळले पाहिजे. लोकांचे आवाज ऐकणे गरजेचे आहे. आपत्ती येत असते, संकटं येत असतात, त्याला तोंड देणं महत्वाचं आहे. मात्र हे सरकार काम करत नाही असं निदर्शनात येत आहे. मजा मस्तीमध्ये सगळे चालले असून यात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकरी बांधव संकटात असल्यावर  कायम उभा असतो, आपल्याला देखील त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी आदितत्य ठाकरे यांनी केले. पुढील काळात खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहे का? असा खरमरीत सवाल त्यांनी यावेळी केला.

"शिधा वाटपात सगळ्या वस्तू मिळाल्या का ते बघावे लागणार असून टेंडर रेट कितीने दिला याची माहिती घ्यावी. सगळ्या वस्तू मिळाल्या का नाही मिळाल्या हे तपासावे. हे सरकार घटणात्मक नाही, काहीही झालं तरी आम्ही शेतकऱ्यांसोबत असून लाठीचार्जला आम्ही घाबरत नाही.  नोटा लोकांच्या हातात पोहचणे महत्वाचे असून 50 खोके गद्दारांच्या घरी पोहचले, मात्र मदतीला पोहोचले  नाही. शिवाय सध्या सामान्यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. 

सरकार राजकारणात व्यस्त 
हे सरकार फक्त राजकारणात व्यस्त असून अन्नदात्याची किंमत त्यांना कळायला पाहिजे. प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे, पण अजून पैसे आलेले नाहीत. पंचनामे अजून झालेले नाहीत. जिथे झाले आहेत तिथे मदत करावी. त्यासाठी राज्यभर दौरे करत असून महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. जिथे शेतकऱ्यांना गरज आहे तेथे उभे राहणार असून उद्धव ठाकरे आणि मी फिरत आहोत.  बांधावर कोण गेलं आणि आमच्या गटात कोण आलं हेच ते दाखवतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगवला आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget