एक्स्प्लोर

17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, शरद पवार म्हणतात...

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे समोर आले आहे.

नागपूर : राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे. सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान पाहुण्यांशी चर्चेदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केले. शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी संध्याकाळी पवार यांनी मेकोसाबाग परिसरात आदिवासी परिषदेत सहभागी झाल्यानंतर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी 17 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्यावा या भीष्माचार्याने, अशी आमची इच्छा आहे, असे डॉ. भाऊ लोखंडे पवारांना म्हणाले. यावर उत्तर देताना पवार यांनी '17 ला अवघड आहे. अजून भरपूर वेळ लागेल', असे उत्तर दिले. तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार  17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे समोर आले आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल. तसेच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्ष चालावे यावर आमची नजर राहील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता. शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले होते. शिवसेनेच्या कडवट हिंदुत्व संदर्भातल्या प्रश्नावर शरद पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासाठी धर्मनिरपेक्षता नेहमीच महत्त्वाची असून सरकार चालवताना आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता हा महत्वाचा मुद्दा असेल असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे या प्रश्नावर स्पष्ट नकार देत पवार म्हणाले, आमची चर्चा फक्त काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे, असेही पवार म्हणाले होते. राज्यात भाजपशिवाय दुसरे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मात्र पवारांनी खोचकपणे उत्तर दिले. पवार म्हणाले की, बरं झाले त्यांनी ( फडणवीस ) हे सांगितले नाही तर माझ्या डोक्यात फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हेच एकमेव विधान होते. फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मात्र, ते भविष्य ही चांगले ओळखतात हे माहीत नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
IPO : आयपीओचा बोलबाला संपला? 2024 मध्ये लिस्ट झालेल्या 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, काय घडलं पाहा
आयपीओमधील हवा निघाली, 2024 मधील 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, कोणत्या IPO मध्ये घसरण?
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.