एक्स्प्लोर

अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपला मोठा धक्का, वैभववाडीतील 7 नगरसेवक शिवसेनेत

नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते सेनेत प्रवेश करत आहेत. सर्व सात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , नगरसेवक आहेत. नितेश राणे कालपर्यंत त्याच्या परिवारावर दबाव टाकत होते. त्यांना तिकिट दिलं जाणार नाही असं बोलणं चुकीचं ठरेल, असं सतीश सावंत यांनी सांगितलं.

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले. त्यानंतर वाभदे वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र काल त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहेत. रवींद्र रावराणे,  संजय चव्हाण, संपदा राणे,  रवींद्र तांबे,  स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार, दीपा गजोबार या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांना सेनेत प्रवेश होत आहे. नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते सेनेत प्रवेश करत आहेत. सर्व सात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , नगरसेवक आहेत. नितेश राणे कालपर्यंत त्याच्या परिवारावर दबाव टाकत होते. त्यांना तिकिट दिलं जाणार नाही असं बोलणं चुकीचं ठरेल, असं सतीश सावंत यांनी सांगितलं.

 शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट - नितेश राणे

शिवसेना हे आमजं जुनं प्रेम आहे. त्यामुळे भाजपमधून जात असलेले सात नगरसेवक ही आमच्याकडून शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट आहे. उद्या तिथं निवडणूक लढवायलाही शिवसैनिक उरला नाही म्हणून कोणी राणेंकडे बोट दाखवाला नको. कारण शेवटी कोकणात शिवसेना ही नारायण राणेंनीच बनवली होती. नितेश राणेंनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला.
अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपला मोठा धक्का, वैभववाडीतील 7 नगरसेवक शिवसेनेत

भाजपला तळकोकणात मोठा धक्का बसला आहे. मात्र भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण असल्याचं म्हटलं आहे. दोन महिण्यापूर्वी आरक्षण पडून जे 7 नगरसेवक सेनेत गेलेत त्यांना त्याठिकाणी भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याने ते शिवसेनेत गेले आहेत. अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने भाजप अजून मजबूत होणार असून वैभववाडी नगरपंचायतमध्ये आगामी निवडणुकीत 17 पैकी 17 जागा भाजप निवडणूक आणेल, असं भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटलं.

वैभववाडीला आरक्षण तीन महिन्यापूर्वी पडल्यानंतर ह्या लोकांमध्ये चलबिचल झाली होती. आपल्याला तिकीट याठिकाणी मिळणार नाही. म्हणूनच त्यांचे त्यांना असं वाटत होतं की आपल्याला बाजूच्या वार्डमधून त्या ठिकाणी तिकीट मिळावं. वैभववाडी परिस्थिती अशी होती, वैभववाडीमध्ये 17 नगरसेवक हे भाजपकडे आलेले होते. त्यातले आज 7 नगरसेवक जातायेत. त्यातली तीन नगरसेवक अपक्ष निवडून आलेले होते. 7 नगरसेवक गेलेत त्या सगळ्यांना आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायला मिळालेच पाहिजे अशा प्रकारची इच्छा होती. पण भाजप त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकत नव्हतं. म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला, असं तेली म्हणाले

मात्र ज्या पद्धतीने त्यांना पब्लिसिटी आपण सगळ्या लोकांनी दिली. वैभववाडीत एकूण मतदान अठराशेच्या आत असून नगरसेवक निवडून येतात ते 100 ते 150 मतांच्या आतमध्ये असलेले नगरसेवक आहेत. नगरपालिकेची आरक्षण पडल्यानंतर या सगळ्या गोष्टींची सुरुवात या ठिकाणी झाली. एका ते दोन महिन्यांच्या आत या ठिकाणी निवडणुका होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप इतका मजबूत आहे. उद्या दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप 17 पैकी १७ जागा वाभादे वैभवाडीत जिंकणार. आत्तापर्यंत ह्या जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या मात्र ग्रामपंचायतीत कुठलाही फरक पडला नव्हता. भाजप पक्ष मजबूत आहे. अमित शाह आल्यानंतर कोकणात भाजप अजून मजबूत झालेला आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे, अमित शाह जिथे जिथे गेले त्या ठिकाणी भाजप अधिक मजबुतीने उभा राहिला. म्हणून आम्ही उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असंही तेली यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget