एक्स्प्लोर

 Santosh Deshmukh murder case : सर्व गावकरी आंदोलनात सहभागी होणार, सरकारकडून कोणतीही चर्चा नाही, नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?

Santosh Deshmukh Murder Case : सर्व गावकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने सर्वजण आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

Santosh Deshmukh Murder Case : पोलीस अधीक्षकांचा (Superintendent of Police) आम्हाला निरोप आला आहे, त्यानुसार गावकरी आणि आम्ही एसपी ऑफिसला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. त्यातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याची माहिती धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिली. सकारात्मकता दाखवली तर गावकरी विचार करतील. सर्व जण आंदोलनात सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने सर्वजण आंदोलनात सहभागी होतील असे देशमुख म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ उद्यापासून आंदोलन करणार आहेत.  

आमच्या आंदोलनासंदर्भात सरकारकडून कोणतीही चर्चा नाही

ठराविक लोकांचा अद्याप निरोप नाही, सर्वजण यात सहभागी होणार आहेत. सरकारचे शिष्टमंडळ भेटीला नाही किंवा निरोप देखील नाही. त्यांची भूमिका वेगळी आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे देशमुख म्हणाले. गावकरी याबाबत निर्णय घेतील असेही धनंजय देशमुख म्हणाले. सुरेश धस यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काय चर्चा केली याबाबत आम्हाला दुपारनंतर माहिती मिळेल. त्यांनी बोलावले म्हणून आम्ही त्यांच्या भेटीला जात आहोत असेही देशमुख म्हणाले. आमच्या आंदोलनासंदर्भात सरकारकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. आपण सरकारच्या नियोजनावर काही बोलू शकत नाही. आम्ही आमच्या नियोजनावर बोलणार असल्याचे देशमुख म्हणाले. आंदोलन करायचं की स्थगित करायचं याबाबतच निर्णय सर्व गावकरी घेतील असे धनंजय देशमुख म्हणाले. 

 मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता

संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी या ग्रामस्थांनी करो या मरोचा इशारा दिला आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि सर्व गटातील लोकांसह महिलाही या आंदोलनात सामील होणार आहेत. दोन दिवस अन्न त्याग आंदोलन केलं जाईल. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुखांची झाली होती हत्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून संतोष देशमुख यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं. त्या गाडीतून 5 ते 6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करु लागले. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. त्यानंतर देशमुखांची आरोपींनी हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन राजकी वातावरण चांगलच तापलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलच लावून धरलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

संतोष देशमुख हत्या प्रकरण: जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, आमदार सुरेश धसांची भूमिका

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget