एक्स्प्लोर

प्रभू श्रीरामाचे अपहरण झालंय, हा कार्यक्रम रामलल्लाचा नाही तर भाजपचा; संजय राऊतांचा घणाघात

देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

मुंबईराममंदिराच्या (Ram Mandir)  उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हा सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भाजपवर (BJP)  टीका केली आहे. राममंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम आहे, असं राऊत म्हणाले. तसंच आम्ही किंवा शरद पवार (Sharad Pawar)  निमंत्रणाची वाट पाहणार नाही, असंही राऊतांनी सांगितलं 

संजय राऊत म्हणाले, राम मंदिराचं निमंत्रण कुणाला मिळालंय माहिती नाही परंतु हा एक पार्टीचा विषय झाला आहे. राममंदिराचं उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम आहे. रामलल्लासाठी हा कार्यक्रम नाही. संपूर्ण देशाला निमंत्रण द्यायचं असते. देव स्वतः त्यांच्या भक्ताला बोलवत असतो आणि भक्त जात असतात. आमचं श्रीरामाशी वेगळं नातं आहे. भाजपला  जे करायचं ते करू द्या. आम्ही इथे किंवा शरद पवार निमंत्रणाची वाट पाहणार नाही. 

प्रभू श्रीरामाचे अपहरण झाले आहे : राऊत 

संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? हा भाजपचा कार्यक्रम आहे. राम मंदिर उत्सव नाही, यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामाचे अपहरण केलं आहे. भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ. आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आम्ही स्वतःच  दर्शनाला जाणार आहे. हा भाजपचा कार्यक्रम आहे त्यांना तो करू द्या, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका 

भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हा हाच प्रकार झाला, हे सर्व राजकीय कार्यक्रम सुरु आहेत. देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे. 

देशात सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधींसारख्यांना न्याय यात्रा काढणं गरजेचं : राऊत 

संजय राऊत म्हणाले,  राज्यात एफडीआय ही चांगली गोष्ट आहे. फक्त ते कुणामुळे वाढले आहे हे देखील पाहिजे. भाजपनं सगळं निवडणुकांवर लक्ष ठेवून सगळं केलं आहे. देशात सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधींसारख्यांना न्याय यात्रा काढणं गरजेचं आहे.  या देशात संविधान सत्य न्याय वाचवण्याची गरज आहे.  त्यामुळे भारत न्याय यात्रा काढणं गरजेचं आहे. राहुल गांधी निघाले आहेत आणि जनता त्यांच्यासोबत आहे. 

हे ही वाचा :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Railway Protest: मुंबईत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
Embed widget