Sanjay Raut: राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?
सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत. तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा आहे.

Sanjay Raut: शिवसेना फुटीचं ग्रहण सुरूच असताना आता आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता खासदार फुटल्यानंतर आता आमदार सुद्धा फुटू लागल्याने शिवसेना ठाकरे गट गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे का? असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. ही सर्व चर्चा होत असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक स्पष्ट वक्तव्य केल्याने नेमका रोख कोणाकडे? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की राजकीय भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे.
झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले
सचिन अहिर फुटल्याने आदित्य ठाकरे यांची वरळी विधानसभेत अडचण वाढली आहे का? संदर्भात बोलताना म्हणाले की, माणसाला समाधानी राहणं फार आवश्यक आहे. सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत. तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सगळं दिल्यानंतरही तुम्ही जात असाल, तर तुम्हाला राजकीय लालसा ही संपवून टाकत असते. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीही नको आहे. राज्यामध्ये नासाडी सुरू असून एक प्रकारे अधःपतन सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की पक्षासोबत राहणारे कार्यकर्ते हे दुर्मिळ असतात.
पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता, अहिरांचा मेसेज
सुनील शिंदे यांनी पराभव केल्यानंतर अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला होता, परंतु आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदार करून, उपनेतेपद देऊन, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष करून आणि अख्खा पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात देऊन त्यांचे राजकीय भविष्य घडवलं असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी सांगितले की, सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांना कोणी भेटत नव्हतं किंवा त्यांचं कोणी ऐकत नव्हतं असं ते सांगू शकत नाहीत, कारण आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब त्यांना रोजच भेटत होते. सचिन अहिर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवला होता की, "पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि भवितव्यासाठी हे करत आहे". यावर राऊत प्रश्न उपस्थित करतात की, मग सर्वसामान्यांनी कार्यकर्ता म्हणून कोणासाठी काम करायचं? अशी विचारणा त्यांनी केली.
राऊत म्हणाले, त्यांनी यापूर्वी शरद पवार साहेबांनाही याच पद्धतीने पुढच्या करिअरसाठी सोडलं होतं. पवारांनी त्यांना धुळीतून शिखरावर नेलं, माडाचं प्रमुख केलं, अनेक वर्ष मंत्री केलं आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षही केले होते. परंतु, अचानक शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेत आले होते. त्यामुळे जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होणार? हे मूळ शिवसैनिक नाहीत. पक्ष हा नेहमी मूळ शिवसैनिकच वाढवतो, बाकी सगळी 'वाऱ्यावरची वरात' असते, जे येतात आणि जातात. सुनील शिंदे जे बोलले ते बरोबर आहे, आम्हाला सगळ्यांनाच आता आत्मचिंतनाची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
महत्त्वाच्या बातम्या






















