एक्स्प्लोर

गाढवांवरुन वाळू तस्करी, प्रशासन चक्रावले !

गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची.

परभणी : वाळू माफियांनी राज्यातील नद्यांची अक्षरश चाळणी केली आहे. वाळू चोरण्याच्या ना ना क्लुप्त्या वाळू माफियांनी आजपर्यंत वापरल्या आहेत. मात्र आता वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर सुरु केला आहे. यामुळे प्रत्यक्ष कारवाई करताना महसूल प्रशासन चक्रावून गेलं आहे. वाळू माफियांनी बोटी, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढल्यानंतर प्रशासनाच्या भीतीने गाढवांद्वारे वाळू तस्करीचा नवा फंडा अमलात आणला आहे. गोदावरी, दुधना आणि पूर्णा या तीन महत्वाच्या नद्यांनी परभणी जिल्ह्याला समृद्ध बनवलं. मात्र आज वाळूच्या वाढत्या तस्करीने या नद्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. उच्च न्यायालयाने कडक निर्बंध घातल्याने वाळू ठेक्यांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. याचाच फायदा घेत नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. 58  गाढवं पकडून कोंडवाड्यात ठेवली वाळूच्या वाहतुकीसाठी टीप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु महसूलचे पथक या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळूच्या वाहतुकीसाठी गाढवांचा वापर वाढविला. गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची. दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरुन नेली जात असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तहसीलदारांनी या गाढवांवर कारवाई केली आहे. गंगाखेडमध्ये 26 तर सोनपेठ मध्ये 32 गाढवं पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आलं आहे. या कारवाई नंतर गंगाखेडमधील गाढव मालक मात्र फरार आहेत. मात्र वाळू माफियांनी लढवलेल्या या नामी शकलीमुळे प्रशासनाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. गाढवांवरुन वाळू तस्करी, प्रशासन चक्रावले ! नद्यांची चाळणी झाली, उपसा कायमचा बंद करण्याची मागणी परभणी जिल्ह्यात एकूण 65 पेक्षा जास्त वाळूचे ठेके आहेत. मात्र उच्च न्यायालयाने हे देताना कडक निर्बंध घालून दिले आहेत. यामुळे अद्याप या ठेक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची टंचाई आहे. सध्या केवळ शासकीय कामांसाठीच काही ठिकाणाहून वाळू उपसण्याचे आदेश आहेत. मात्र  वाळू माफियांनी जिल्हाभरातील अनेक ठेक्यांमधून अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. ज्यावर प्रशासन कारवाई करत असलं तरीही ना ना प्रकारे वाळूचा उपसा सुरूच असल्याने नद्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. नदीकाठच्या गावातील पाणी पातळीवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे वाळू उपसा कायमचा बंद करण्याची मागणी गावकरी करत आहेत. प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलीस ठाणे, तहसीलमध्ये लावून ठेवतात. त्या मालकांवर गुन्हे दाखल करुन दंड वसूल करुन गाड्या सोडल्या जातात. मात्र आता ही गाढवं पकडून त्यांना किती दिवस कोंडून ठेवणार? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर या गाढवांना खाऊ-पिऊ घालायचे काम देखील प्रशासनाला करावे लागणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, कर कपातीमुळं मागणी वाढणार, एस अँड पीची  भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज, सरकारचे तीन निर्णय गेमचेंजर ठरणार
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Embed widget