एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी इम्पॅक्ट : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याने 5 हजार 657 रुग्णांचा जीव टांगणीला, अशी बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. यानंतर राजकीय नेत्यांना जाग आल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आल्याने 5 हजार 657 रुग्णांचा जीव टांगणीला. अशा प्रकारची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं. शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला. तर, आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना जाऊन भेटले. परिणामी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक आता काढण्यात आला आहे. दरम्यान, अर्ज घेणार की नाही हे दुपारी 2 नंतर कळेल.
राज्यात सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांच्या मदतीसाठीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता. त्यामुळं राज्यातील 5 हजार 657 रुग्ण मृत्यूच्या छायेत असल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राजकीय नेत्यांना जाग आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं आहे. तर आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.
"मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. मा. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले". असे ट्वीट मुख्यमंत्रींनी राज्यपालांच्या भेटीनंतर केलं आहे. धनंजय मुंडे यांचे ट्वीट - "मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे".मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. pic.twitter.com/lM8TVFHSmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आतपर्यंत सुमारे 21 लाख रुग्णांना गेल्या 5 वर्षात 1600 कोटींची मदत करण्यात आली आहे. सध्या कक्ष बंद असल्याचा फलक काढला आहे. मात्र, अर्ज घेणार की नाही हे मात्र 2 नंतर समजले नाही.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे. @BSKoshyari pic.twitter.com/l4Vlw9HUQR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2019
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement