एक्स्प्लोर

Aditya Thackeray: संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांना मागणी...'

Aditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

मुंबई: शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आज देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आज संजय राऊत घराची रेकी झाली. त्यांच्या घराची रेकी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात लोक बाईक वर आले, राऊत यांच्या दिल्लीच्या घराची सुद्धा रेकी झाली आहे. आज मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे की, हे लोकं कोण आहेत याचा तपास करावा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे त्यावर उपयोजना केल्या पाहिजे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

सुरक्षा देणं घेणं किंवा काढणं याबाबतचे राजकीय निर्णय कधीकधी होत असतात. गेल्या अडीच वर्षात सुडाचं राजकारण झालं, नको त्यांना सुरक्षा दिली गेली. पाहिजे त्यांची सुरक्षा काढली गेली. पण मला त्याच्यात जायचं नाही. काल आपण जे पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये होतं, सुडाचं राजकारण करणार नाही. राज्याला एकत्र येऊन पुढे चालणार. विरोधी किंवा त्यांच्यासोबतचे नेते असतील भेदभाव होणार नाही. आज देखील त्यांनी बीडवरती उत्तर दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था मोडलेला चालणार नाही याची सुरुवात इथपासून होते. मी आता त्यांना विनंती केलेली आहे. संजय राऊत कोणत्याही बाजूचे असतील ते कोणत्या विचारधारेचे असतील पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणे गरजेचे आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती. संजय राऊतांच्या जीवाला धोका वाटत आहे. त्यांच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हावेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे, तो पक्षाचे अंतर्गत आहे. तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत. जे तुम्ही आता भेटी मोजत चाललंय,ते मुख्यमंत्री आहेत. पुढच्या पाच वर्षात अनेकदा भेटी होतील, असंही ते पुढे म्हणालेत.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget