एक्स्प्लोर

Aditya Thackeray: संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांना मागणी...'

Aditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

मुंबई: शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आज देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आज संजय राऊत घराची रेकी झाली. त्यांच्या घराची रेकी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात लोक बाईक वर आले, राऊत यांच्या दिल्लीच्या घराची सुद्धा रेकी झाली आहे. आज मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे की, हे लोकं कोण आहेत याचा तपास करावा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे त्यावर उपयोजना केल्या पाहिजे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

सुरक्षा देणं घेणं किंवा काढणं याबाबतचे राजकीय निर्णय कधीकधी होत असतात. गेल्या अडीच वर्षात सुडाचं राजकारण झालं, नको त्यांना सुरक्षा दिली गेली. पाहिजे त्यांची सुरक्षा काढली गेली. पण मला त्याच्यात जायचं नाही. काल आपण जे पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये होतं, सुडाचं राजकारण करणार नाही. राज्याला एकत्र येऊन पुढे चालणार. विरोधी किंवा त्यांच्यासोबतचे नेते असतील भेदभाव होणार नाही. आज देखील त्यांनी बीडवरती उत्तर दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था मोडलेला चालणार नाही याची सुरुवात इथपासून होते. मी आता त्यांना विनंती केलेली आहे. संजय राऊत कोणत्याही बाजूचे असतील ते कोणत्या विचारधारेचे असतील पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणे गरजेचे आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती. संजय राऊतांच्या जीवाला धोका वाटत आहे. त्यांच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हावेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे, तो पक्षाचे अंतर्गत आहे. तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत. जे तुम्ही आता भेटी मोजत चाललंय,ते मुख्यमंत्री आहेत. पुढच्या पाच वर्षात अनेकदा भेटी होतील, असंही ते पुढे म्हणालेत.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Embed widget