एक्स्प्लोर

'या' कारणांमुळे उदयनराजेंचा भाजपप्रवेश रखडला

खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले होते. उदयनराजेंनी तशी कमिटमेन्ट केली होती. परंतु त्यांची ही कमिटमेन्ट अधांतरी राहण्याची शक्यता आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले होते. उदयनराजेंनी तशी कमिटमेन्ट केली होती. परंतु त्यांची ही कमिटमेन्ट अधांतरी राहण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या मेगा भरती पार्ट तीनमधून उदयनराजेंचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे उदयनराजे अचानक होल्डवर का गेले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. उदयनराजेंना भाजपने होल्डवर ठेवण्यामागची पाच प्रमुख कारणं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. पहिलं कारण : पक्षाच्या चौकटीत न राहणारे उदयनराजे उदयनराजे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत बसत नाहीत. पक्षाची विचारधारा सांभाळणं, त्याचा अंदाज घेऊन बोलणं याकडे उदयनराजे लक्ष देत नाहीत. (उदा. समजा उदयनराजे भाजपमध्ये गेले... आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात काही तरी विधान केलं... तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना काय वाटेल?) दुसरं कारण : एका म्यानात दोन तलवारी कशा? साताऱ्याचं अर्थकारण दोन राजेंच्या भोवती फिरतं... (उदयनराजे आणि त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले) शिवेंद्रराजे सध्या भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही राजेंना वाटेकरी नको. तिसरं कारण : लोकसभेची जागा कुणाकडे? युतीमध्ये साताऱ्याची लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उदयनराजे जर भाजपमध्ये गेले तर शिवसेनेला ही जागा राजेंसाठी सोडावी लागले, परंतु शिवसेना हे मान्य करेल का? चौथं कारण : भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी फलटणच्या एका उद्योजकाला धमकावल्याचा उदयनराजेंवर आरोप आहे आणि योगायोगाने हा उद्योजक अमित शाह यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच भाजपचे शीर्ष नेते उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला अनुकूल नाहीत. पाचवं कारण : पश्चिम महाराष्ट्राचा नेता कोण? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा आहेत. सूत्रांच्या मते चंद्रकांत पाटील यांना पक्षामध्ये प्रतिस्पर्धी नको आहे. उदयनराजे भाजपवासी झाले तर ते चंद्रकांत पाटलांसाठी स्पर्धक ठरतील. त्यामुळेच राजेंना भाजपपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. व्हिडीओ पाहा स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानं खालसा झाली. परंतु सातारचे संस्थान लोकशाही आल्यावरही या लोकशाहीच्या माध्यमातून कायम राहिलं. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कोणताही बदल झाला तरी साताऱ्याचे राजकारण म्हणजे इथलं राजघराणं हे समीकरण सत्तर वर्षांमध्ये कायम राहिलं आहे. मात्र या संस्थानाला राजकारणात टिकून राहण्यासाठी नेहमीच सत्तेचा आधार घ्यावा लागला आहे. आत्ताही उदयनराजे तोच आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यावेळी त्यांच्यासमोर आहेत ते मोदी आणि शाह आणि हेच उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त न लागण्याचं मुख्य कारण आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Atul Save OSD Crime News: 'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
Embed widget