Mohan Bhagwat : मी 75 वर्षांचा झालोय, थांबतो म्हणालो, पण....; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्याख्यानमालेत मोहन भगवतांचे निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...
Rashtriya Swayamsevak Sangh: जो हिंदू आहे तोच संघचालक बनेल. तो एससी, एसटी, ब्राम्हण, क्षेत्रीय होईल असं नाही. जो काम करेल तोच संघचालक होईल, असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे

Mohan Bhagwat मुंबई : माझे 75 वर्ष पूर्ण झालेय. मी कार्यकर्त्यांना विचारले माझे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यावेळी कार्यकर्ता म्हणाले काय अडचण आहे. त्यामुळे मी इथे बसेल हे माझ्या हातात नाही आणि इथून जाणे हे देखील माझ्या हातात नाही, तर संघाच्या हातात आहे. आतापर्यंत कुणाला निवृत्त करण्याची वेळ आली नाही. किंबहुना जो हिंदू आहे तोच संघचालक बनेल. तो एससी, एसटी, ब्राम्हण, क्षेत्रीय होईल असं नाही. जो काम करेल तोच संघचालक होईल, असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) व्याख्यानमालेत ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आज या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे या व्याख्यानमालेला संबोधित करत असून कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राजकारण, सिनेमा, साहित्य, प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरे होत आहेत. आजच्या संवादात सरसंघचालकांनी अनेक मुद्द्यांवर महत्त्वाचं भाष्य केलंय
Mohan Bhagwat on RSS: सरसंघचालक ब्राम्हण, क्षत्रिय, क्षुद्र, बनू शकत नाही तर हिंदू बनू शकतो
संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या जवळ यावं लागेल मग तुम्हाला संघ समजेल. विद्यमान सरसंघचालक पुढील सरसंघचालक निवडतात आणि जबाबदारीतून निवृत्ती होऊ शकते. 75व्या वर्षानंतर जबाबदारीमधूज निवृत्त होऊन काम करावं हे संघात दिसतं. मात्र मी पदावर राहावं ही माझी इच्छा नाही. संघ सांगेल तेच होईल. निवृत्तीचे कारण काय ते पाहावे, कुणाला निवृत्त करावं अशी वेळ अजून आली नाही. मात्र सरसंघचालक ब्राम्हण, क्षत्रिय, क्षुद्र, बनू शकत नाही तर हिंदू बनू शकतो, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचं समर्थन आहे. संविधानाने ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यांना जोपर्यंत त्यांची गरज संपत नाही तोपर्यंत ते राहायला हवं. ज्यादिवशी गरज संपेल, त्यावेळी त्यांनी सांगवं. म्हणजे आरक्षणाचा लाभ गरजवंतांना देता येईल. असेही मोहन भागवत म्हणाले.
Mohan Bhagwat : भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील, अखंड भारत होईलच
बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत, एकत्र आले तर काहीही करू शकतात. भारताच्या विभाजनापेक्षा 2047 मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना करा. जे सुलतान, बादशाह, इंग्रज करू शकले नाही ते आता काय होणार? भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील. हे मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत. अखंड भारत होईलच. असा आशावाद देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलताना व्यक्त केलाय.























